Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पालकांनो मुलांकडे लक्ष द्या! घराबाहेर खेळणाऱ्या चार वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नवी मुंबईतील घटना

20

पनवेलः नवीन पनवेल मधील पंचशील नगर येथील रेल्वेच्या नवीन रुळाचे काम चालू आहे. त्यासाठी जागोजागी खड्डे खोदण्यात आले असून पंचशील नगरमधील रहिवाशी असलेली माही सिद्धेश वाघमारे ह्या चार वर्षीय मुलीचा खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चिमुकलीच्या दुर्दैवी झालेल्या मृत्यूने परिसरामध्ये आणि नातेवाईकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला आहे.

नवीन पनवेलमधील पंचशील नगरलगत रेल्वेच्या नवीन रुळांचे काम चालू असून त्यासाठी जागोजागी खड्डे खोदण्यात आले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. पंचशील नगरमध्ये राहणारी माही वाघमारे ही खेळता खेळता चुकून खड्डयातील पाण्यात पडली. काही प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तेथे धाव घेऊन माहीला खड्ड्याबाहेर काढले व रुग्णालयात हलवले. मात्र तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. रेल्वेचे काम चालू असल्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे केले आहेत. मात्र ह्या खड्ड्यांच्या बाजूला कुठेही कुंपण किंवा बोर्ड लावण्यात आलेला नाहीये. तसेच शेजारी लोकवस्ती असून येथे एकही सुरक्षारक्षक नेमलेला नसल्यामुळे अशा घटना अनेक वेळा घडलेल्या आहेत.

वाचाः नव्या व्हेरियंटमुळं टेन्शन, राज्य सरकारने उचलली गंभीर पावलं, कृतिगट स्थापन करणार
रेल्वेने दिलेल्या ठेकेदाराने कोणतीही सुरक्षा येथे नेमली नसल्यामुळे एका चार वर्षीय मुलीचा नाहक जीव गेला आहे. रेल्वे पोलीस घटनेचा तपास करत असून पुढील कारवाई सुरू आहे. या आगोदर देखील पनवेल रेल्वेचे काम चालू असताना २०१९ मध्ये तीन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. रेल्वेचे काम पुर्णत्वास गेले नसल्याने साचलेल्या पाण्यात पडून लहान मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुलीच्या नातेवाईकांसह संपूर्ण परिसरातील रहिवाशी आक्रमक झाले असून या खड्ड्यांना कारणीभूत असलेल्या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

वाचाः उद्यापासून भरणार हुडहुडी?; राज्यातील या भागांत पुढील पाच दिवस थंडीचा कडाका जाणवणार

सकाळच्या वेळी खेळताखेळता खड्ड्यात पडलेल्या माही वाघमारेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे अशा निरागस चिमुकल्यांच्या बळींना जबाबदार असणाऱ्या ठेकेदारांवर पोलीस कारवाई करण्यात टाळाटाळ करीत असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे.

वाचाः मोठी बातमी! महामुंबईत २९६ सीएनजी पंपची उभारणी करणार; या शहरातील मुख्य रस्त्यांवर सुविधा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.