तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

वाहतूककोंडीपासून सुटका होणार! डोंबिवली पश्चिम ते दुर्गाडी अंतर आता सहा मिनिटांत पार करता येणार

0 97

म. टा. वृत्तसेवा, कल्याणः कल्याण दुर्गाडी ते टिटवाळा या रिंगरोडच्या ४ ते ७ टप्प्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून तिसऱ्या टप्प्यासाठी ५३१ कोटींच्या निविदा एमएमआरडीएकडून प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या टप्प्यात डोंबिवली पश्चिम मोठागाव ते दुर्गाडीपर्यंतच्या नदीकिनारी रस्त्याचे काम केले जाणार असून यामुळे मोठागाव ते दुर्गाडी हे १० किमीचे अंतर ६ मिनिटांत गाठता येणार असल्याची माहिती खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी रविवारी दिली.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात रस्ते, उड्डाणपुलाचे जाळे निर्माण करत नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून १ हजार कोटी रुपयांचा निधी कल्याण डोंबिवलीसाठी देण्यात आला असून या निधीतून शहरातील अनेक रस्ते सीमेंट कॉंक्रिटचे केले जाणार आहेत. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन खासदार शिंदे यांच्या हस्ते रविवारी डोंबिवलीत करण्यात आले. आवश्यक सुविधा याच भागात मिळाल्या पाहिजेत, या भागाचाही विकास वेगाने झाला पाहिजे. प्रत्येकाची समृद्धी त्या-त्या ठिकाणी झाली पाहिजे, असे प्रतिपादन शिंदे यांनी केले. डोंबिवली पश्चिमेस स्मशानभूमीचे कामदेखील लवकरात लवकर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. काटई ते ऐरोली फ्री वे आणि नागपूरच्या धर्तीवर दुमजली उड्डाणपुलावर कल्याण शिळ मार्गावर मेट्रो मार्गाचे जाळे तयार करत नागरिकाची वाहतूककोंडीतून सुटका केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रिंगरोडचा मार्ग

दुर्गाडी ते मोठागाव या रस्त्यात २ किमीचा मार्ग हा खाडीकिनारी स्टिल्ट रस्त्याच्या स्वरूपात असणार आहे. तर चार किमीचा रस्ता जमिनीलगत असणार आहे. या मार्गामुळे डोंबिवलीतील आजपर्यत दुर्लक्षित राहिलेले मोठा गाव मध्यवर्ती ठिकाण ठरणार आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.