
Tej Police Times
वाचाः बळीराजा चिंताग्रस्तच! नऊ महिन्यांत २,१३८ शेतकऱ्यांनी संपवले जीवन, उपाययोजनानंतरही टोकाचे पाऊल
जांभोळा गावातील नितीन आत्राम हा नऊ वर्षाचा मुलगा आई-वडिलांसोबत रविवारी शेतात गेला होता. सायंकाळपर्यंत आई-वडील शेतात काम करीत होते. या दरम्यान मुलाला भूक लागल्याने तो आईवडिलांनी त्याच्यासाठी आणलेला डब्बा खाण्याकरीता शेतातीलच एका धुऱ्यावर गेला होता. आई-वडिल एकीकडे काम करीत होते. मात्र, सायंकाळी पाचच्या सुमारास शेतशिवारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने डब्बा खात असलेल्या त्याच्यावर हल्ला चढवला.
वाचाः वाहतूककोंडीपासून सुटका होणार! डोंबिवली पश्चिम ते दुर्गाडी अंतर आता सहा मिनिटांत पार करता येणार
घटनास्थळापासून त्या चिमुकल्याला बिबट्याने अर्धा किलोमीटर फरफटत नेले. लगतच जनावरे चारत असलेल्या देवराव धुर्वे याला सदर घटना लक्षात आली. त्यांनी मुलाला वाचविण्याकरीता प्रचंड आरडाओरड केली. आई – वडिलांनी मुलाला वाचविण्याकरीता घटनास्थळाकडे धाव घेतली. परंतु, तोपर्यंत मुलांचा मृत्यू झाला होता. या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे. गावकरीही भीतीच्या छायेत वावरत आहेत.
वाचाः चीनमध्ये करोनाचा विस्फोट; रोज दहा लाख रुग्ण पॉझिटिव्ह, काही दिवसात रुग्णसंख्या दुप्पट होण्याची भीती
Recover your password.
A password will be e-mailed to you.