
Tej Police Times
वाचा- १९ वर्षीय तरुणासोबत अनैसर्गिक कृत्य; शेतात पार्टी करण्यासाठी गेल्यावर भयानक प्रकार
घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी जे अर्ज करणार आहेत त्यांनी एकदाच नोंदणी करताना आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी लागतील. यामुळे प्रत्येक सोडतीआधी नव्याने नोंदणी करण्याची गरज असणार नाही. ही नोंदणी कायमस्वरुपी असेल. या नोंदणीनंतर मुंबई मंडळ, कोकण मंडळ वा अन्य कोणत्याही मंडळाच्या सोडतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्थात यासाठी काही नियम देखील आहेत. नोंदणी करणाऱ्याला प्रत्येक ५ वर्षानंतर निवासाचा दाखला आणि प्रत्येक वर्षाला उत्पन्नाचा दाखला आणि आयकर विवरण पत्र सादर करावे लागले.
वाचा- टीम इंडियासाठी २०२३ आहे खास! वनडे वर्ल्डकप आणि…, असे आहे वर्षभराचे वेळापत्रक
म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोडतीसाठीची नोंदणी ही अॅपवरून देखील करता येईल. यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, निवासाचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे ऑनलाइन सादर करावी लागतील. नोंदणी झाल्यानंतर सोडतीसाठी नोंदणीधारक त्याच्या इच्छेनुसार अर्ज दाखल करू शकेल.
फक्त चावी घेण्यासाठी…
म्हाडाने केलेल्या या नव्या बदलामुळे अर्जदाराची पात्रता आधीच निश्चित होणार आहे. त्यामुळे सोडतीनंतर लगेच देकार पत्र दिले जाईल. जो विजेता घराची संपूर्ण रक्कम जमा करेल त्याला एका दिवसात चावी देखील दिली जाईल. यामुळे सोडतीनंतर विजेत्याला फक्त एकदाच तेही चावी घेण्यासाठी म्हाडाच्या कार्यालयात यावे लागले.
Recover your password.
A password will be e-mailed to you.