
Tej Police Times
मुंबई : निवडणूक आयोगाने गेले वर्षभर मतदारायाद्या अद्ययावत करण्याच्या राबविलेल्या मोहिमेनंतर राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे चार लाख ४३ हजार ५०० मतदारांची संख्या वाढली असल्याचे दिसून आले आहे. निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार ५ जानेवारीपर्यंत राज्यात ९ कोटी २ लाख ८५ हजार ८०१ मतदार असल्याची नोंद करण्यात आली असून गेल्यावर्षी हा आकडा ८ कोटी ९८ लाख ४२ हजार ३०१ होता. दरम्यान, राज्यात ४० लाख दुबार मतदार आढळल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.
Recover your password.
A password will be e-mailed to you.