
Tej Police Times
मुंबई : मुंबईसह राज्यभरात अनेकदा गृहनिर्माण प्रकल्प अर्धवट सोडणे, प्रकल्पात विविध आडकाठी येणे यासारख्या प्रकारांनी घर खरेदीदारांना बराच मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र आता गृहखरेदी बिनधोक होऊ शकणार आहे. महारेराकडे नोंदणीवेळी आता सर्व गृहनिर्माण प्रकल्प प्रर्वतकांना स्वत:प्रमाणेच प्रकल्पाशी निगडित असलेल्या अन्य संचालकांचेही स्व-प्रतिज्ञापत्र दाखल करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महारेराने १ जानेवारीपासून लागू केलेल्या या निर्णयामुळे घर खरेदीपूर्वीच ग्राहकांना योग्य, अचूक, विश्वसनीय माहिती उपलब्ध होणार असल्याने प्रवर्तकांकडून केली जाणारी फसवणूक टळणार आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.