Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

फक्त गुजरातलाच प्राधान्य देणं पंतप्रधान मोदींना शोभत नाही; राज ठाकरेंचे खडे बोल

4

पुणे: महाराष्ट्र हे राज्य सर्वार्थाने श्रीमंत आहे. एखादा उद्योग राज्याबाहेर गेल्याने महाराष्ट्राला फरक पडत नाही. पण म्हणून सर्व बडे उद्योग प्रकल्प गुजरातलाच नेणे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभत नाही, असे परखड मत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले. आपण गुजरातचे आहोत म्हणून गुजरातला प्राधान्य देणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभत नाही. आधीचे पंतप्रधान मनमोहन सिंग हे पंजाबी होते मग त्यांनी काय फक्त पंजाब राज्यापुरतं पाहावं का? उद्या आसामचा कोणीतरी होईल त्यांनी तसंच करायचं का? भारत हा एकसंध देश आहे, हेनुसतं बोलण्यापुरतं आहे का? एकसंधपणा असा असतो का, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. ते रविवारी पुण्यातील जागतिक मराठी संमेलनच्या व्यासपीठावरुन बोलत होते.

शरद पवार माझ्यावर टीका करतात, पण ‘या’ कारणामुळे मी राजकारणावर सतत बोलणे टाळतो: राज ठाकरे

यावेळी राज ठाकरे यांना गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील बडे उद्योग गुजरातमध्ये गेल्याच्या मुद्द्यावरुन सुरु असलेल्या वादाबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर राज ठाकरे यांनी म्हटले की, महाराष्ट्र हा श्रीमंत आहे, सर्वार्थाने अग्रेसर आहे. जे आहे ते जरी टिकवलं तरी महाराष्ट्र पुढे आहे. त्यामुळे एखाद दुसरा उद्योग बाहेर गेल्याने काही फरक पडत नाही. परंतु, आपण गुजरातचे आहोत म्हणून गुजरातला प्राधान्य देणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभत नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले. यावर आता भाजपचे नेते काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागेल.

राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप करणाऱ्या राज ठाकरेंचा शरद पवारांनी एका वाक्यात निकाल लावला, म्हणाले….

महाराष्ट्रातील राजकारणाचा दर्जा ढासळतोय: राज ठाकरे

राज्यातील सध्याची राजकीय स्थिती लयाला गेली आहे. महाराष्ट्रातील राजकारणाची एकूण परिस्थिती उद्विग्न करणारी आहे. त्यामुळे मी महिने-दोन महिने राजकारणावर बोलतच नाही. नारायण राणे किंवा संजय राऊत एकमेकांवर काय टीका करतात, याच्याशी लोकांना काय देणघेणं आहे. त्यामुळे मी राजकीय परिस्थितीवर बोलणे टाळतो. परिणामी मी अनेक दिवस राजकारणाबाबत बोलतच नाही. जातींमध्ये तेढ निर्माण करून त्यामध्ये महापुरुषांना खेचणे, हे राजकारण नव्हे. सध्याच्या काळात कोणालाही वाटायला लागलंय की, मी इतिहासतज्ज्ञ आहे. हे सर्वजण कोणताही विचार न करता बोलत असतात. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही सुरु आहे. येथील राजकारण लयाला गेले आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.