
Tej Police Times
‘आताची पाच वर्षे ही चमत्कारिकच राहिली. सध्या राज्यात हे तिसरे सरकार आहे. पहिले सरकार हे अडीच दिवसाचे होते. दुसरे सरकार हे अडीच वर्षाचे होते तर तिसरे सरकार हे सध्या सत्तेत आहे आणि चौथे सरकार कधीही येऊ शकेल अशी परिस्थिती आहे. काहीही सांगता येत नाही. महाराष्ट्रात निवडणुका होतच नाहीत. निवडणुका कधी होतील हे ही सांगता येत नाही’, असेही यावेळी अमित देशमुख यांनी म्हटले.
Amit Deshmukh : बोलण्यातला ठहराव, चालण्या-बोलण्याची लकब, अनेकांना विलासराव देशमुख भाषण करत असल्याचा भास
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच अमित देशमुख यांच्या भाजपमधील प्रवेशाच्या चर्चेसंदर्भात भाष्य केले होते. ‘येत्या काही दिवसात भाजपमध्ये अनेक मोठमोठे नेते प्रवेश करतील. महाविकास आघाडीतील नेत्यांचा पूर्ण पक्ष रिकामा होईल. शिवसेनेचे अनेक नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. प्रवेशाचे बॉम्बस्फोट होतील आणि महाराष्ट्राला धक्का बसेल असे प्रवेश होतील’, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगाबादमध्ये बोलताना केला होता.
Recover your password.
A password will be e-mailed to you.