
Tej Police Times
ज्ञानेश्वर अंबादास चव्हाण आणि बाळू राठोड हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी जखमी जावई आणि सासर्याला उपचारासाठी जालना येथे पाठविले. मात्र ज्ञानेश्वर चव्हाण यांचा रस्त्यामध्येच मृत्यू झाला. तर जावई बाळू राठोड गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयामध्ये हलवण्यात आले आहे.
हेही वाचा : एसटीचा स्टेअरिंग रॉड तुटला, भीषण अपघात; रक्तबंबाळ अन् विव्हळणाऱ्या प्रवाशांचा मदतीसाठी धावा
मयत ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मृतदेहाचे मंठा येथे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. त्यांच्यावर कवडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेविषयी माहिती घेण्यासाठी चारठाणा पोलिसांना संपर्क साधला असता सदरील अपघाताची अद्याप पर्यंत नोंद झाली नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
हेही वाचा : हसतमुख गुरुजींची डोळ्यात पाणी आणणारी एक्झिट, ट्रकखाली चिरडून मुख्याध्यापकांचा अंत
Recover your password.
A password will be e-mailed to you.