
Tej Police Times
महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील शनिवारी अहमदनगर येथे प्रचारासाठी आल्या होत्या. त्यावेळी आयोजित बैठकीत देशमुख बोलत होते. देशमुख म्हणाले, ‘जिल्ह्यातील सर्वच पक्षाचे कार्यकर्ते व्यक्ती पूजेपेक्षा विचारधारेला व पक्षाच्या आदेशाला महत्त्व देतात. याशिवाय नगर जिल्ह्यातील प्रत्येक निवडणुकीत अज्ञात शक्ती कार्यरत असते. या शक्ती निवडणूक निकालाला दिशा देतात. त्यामुळे नगर जिल्ह्यातून शुभांगी पाटील यांना निश्चितच आघाडी मिळेल.’
देशमुख यांच्या वक्तव्याचे आता वेगवेगळे अर्थ लावले जाऊ लागले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची सर्वपक्षीय यंत्रणा नेहमीच चर्चेत असते. ही पूर्वीपासूनच यंत्रणा असल्याचे मानले जाते. विखे पाटील कोणत्याही पक्षात असले तरी ही सर्वपक्षीय यंत्रणा विखे पाटील यांना हवी असलेली कामगिरी करते, अशी चर्चा प्रत्येक निवडणुकीच्या वेळी होत असते. सध्याच्या निवडणुकीतही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या भूमिकेकडे जसे लक्ष लागले आहे, तसेच त्यांचा राजकीय प्रतिस्पर्धी विखे पाटील यांच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे.
पक्षाने अधिकृत पाठिंबा दिला तर तांबे यांचे काम करण्याची भूमिका त्यांनी आधीच स्पष्ट केली आहे. मात्र, काँग्रेसने तांबे पिता-पुत्रांना निलंबित केल्यानंतरही भाजपने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही. शिवाय काही दिवसांपूर्वी विखे पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिर्डी विमानतळावर गुप्त चर्चा झाली होती. विखे आणि भाजपची उघड भूमिका अद्याप जाहीर झालेली नसताना देशमुख यांनी नगर जिल्ह्यातील अज्ञात शक्ती असा उल्लेख केल्याने ही शक्ती नेमकी कोणती? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.
कोंबड्यांची झुंज पाहायला गाव जमला; कोंबडे उडाले, मालक अन् प्रेक्षकाचा जीव गेला
या बैठकीत बोलताना उमेदवार शुभांगी पाटील म्हणाल्या. ‘मी सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून उभी आहे. मागील अनेक वर्षे मी शिक्षकांच्या प्रश्नासाठी संघर्ष करीत आहे. आझाद मैदानावर दीडशेपेक्षा जास्त आंदोलनाचे नेतृत्व मी केले आहे. धनशक्तीच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडता या निवडणुकीत इतिहास घडवावा,’ असे आवाहन त्यांनी केले.
कंगना रणौतनं ‘इमर्जन्सी’साठी सर्वस्व लावलंय पणाला! म्हणाली, ‘माझी सर्व मालमत्ता…’
बैठकीला अहमदनगर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हा महिला अध्यक्षा रेश्मा आठरे, शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक दहिफळे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस श्याम वागस्कर, भिंगार काँग्रेसचे सरचिटणीस अनिल परदेशी, राष्ट्रवादी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष विनोद साळवे, रूपाली पुंड, रेणुका पुंड, काँग्रेसच्या नलिनी गायकवाड, सुनिता बागडे, शिक्षक सेनेचे अंबादास शिंदे, राष्ट्रवादीचे अमित खामकर, अनंत गारदे, घोरपडे, काँग्रेस अल्पसंख्यांक प्रदेश सचिव फिरोज शफीखान, अभिजीत कांबळे, राजेश भाटिया, मुकुल देशमुख, हर्षवर्धन देशमुख यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
अजित पवारांचा अनुभव दांडगा, ते मलाही फोनवरुन सूचना देतात- मुख्यमंत्री
जनतेच्या आशीर्वादाने निवडणूक लढणार; माघार घेतलेली नाही, लढाई जिंकायचीये | शुभांगी पाटील
Recover your password.
A password will be e-mailed to you.