तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

मुंबईकरांनी करुन दाखवले! करोना संसर्गाबाबत ३४ महिन्यांनंतर मुंबईतून आली गुड न्यूज

0 55

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असताना मुंबईमध्ये तब्बल ३४ महिन्यांनंतर मंगळवारी करोनारुग्णांची शून्य नोंद झाली. त्यामुळे मुंबईतून करोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात येत असून मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईमध्ये करोनाचा पहिला रुग्ण मार्च २०२०मध्ये सापडला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत करोनारुग्णांच्या संख्येने पाच अंकी संख्या गाठली, तर हजारो रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यात यश आले. त्यानंतर आलेल्या तीन लाटांमध्येही रुग्णांवर योग्य उपचार करून साथ रोखण्यात यश आले. परिणामी काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आहे. मंगळवारी मुंबईत करोनारुग्णांची शून्य नोंद झाली. या आधी १६ मार्च २०२० रोजी रुग्णसंख्या शून्य होती.

आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ११ लाख ५५ हजार २४० इतकी झाली आहे. तर मृतांची संख्या १९ हजार ७४७वर स्थिरावली आहे. दिवसभरात आठ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ११ लाख ३५ हजार ४७० रुग्ण करोनातून बरे झाले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.