Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आईच्या मृत्यूपूर्वी शाहरुखने तिला नको नको ते ऐकवलेलं; माऊलीच्या जाण्याने आजही होतोय पश्चाताप

9

मुंबई- बॉलिवूडचा किंग खान असलेला शाहरुख आज तब्बल ५ वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उतावीळ झाले आहेत. सगळीकडे फक्त ‘पठाण’चीच चर्चा आहे. चाहत्यांमध्ये उत्साह संचारलाय आणि चाहते शाहरुखला पाहण्यासाठी अख्ख थिएटर बूक करत आहेत. सगळं वातावरणच शाहरुखमय झालं आहे. मात्र अशातच शाहरुखशी संबंधित एक जुनी गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय. जेव्हा तो आईच्या मृत्यूच्या वेळेस तिच्याशी वाईट वागला होता. त्या गोष्टीचा त्याला आजही पश्चाताप होतो मात्र आता वेळ निघून गेली आहे. आपण वागलो ते चुकीचं होतं आणि त्याचं आपल्याला आजही वाईट वाटत असं शाहरुखने एका मुलाखतीत म्हटलं होतं.

काही वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत शाहरुखने या गोष्टीबद्दल सांगितलं होतं. शाहरुखने म्हटलेलं की तो आईला वाचवण्यासाठी ते सगळं बोलत होता मात्र ते सगळं चुकीचं होतं हे त्याला आता जाणवतंय. त्यामुळे आईला आणखीनच दुःख झालं असेल. मुलाखतीत बोलताना शाहरुख म्हणाला, ‘जेव्हा माझी आई लतीफ फातिमा खानची तब्येत बिघडली होती तेव्हा मी तिला भेटायला आयसीयूमध्ये गेलो होतो. मला वाटलं मी तिला राग येईल असं काही बोललो तर ती मला ओरडायला तरी बरी होईल आणि घरी येईल. म्हणून मी तिला म्हणालो की मी दीदीला खूप त्रास देईन, नोकरीही करणार नाही आणि खूप मद्यपान करेन. इतकं की एक दिवस दारूच्या आहारी जाईन. पण हे सगळं बोलूनही आई उठली नाही. काही दिवसांनी ती आम्हाला सोडून गेली. शेवटच्या क्षणी आईला असं बोललो त्याचा मला आजही पश्चाताप होतो.’


शाहरुखचं हा बोलणं ऐकून तिथे उपस्थित सगळेच भावुक झाले होते. शाहरुख आता ‘पठाण’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यासोबतच तो ‘जवान’ आणि ‘डंकी’ या चित्रपटातही झळकणार आहे. सध्या पठाणला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षक शाहरुखचं कौतुक करत आहेत.



Source link

Leave A Reply

Your email address will not be published.