
Tej Police Times
हेही वाचा -जेली चॉकलेट बाळाच्या घशात अडकलं, आईनं प्रयत्नांची शर्थ केली, पण जे व्हायला नको तेच घडलं
आत्महत्या करणारा गिरीश हा उल्हासनगर येथे एका कंपनीत कामाला होता. या कंपनीत काम करणाऱ्या जय आणि विनोद या दोन लोकांनी गिरीशच्या मालकाला चुगली केली आणि त्यामुळे मालकाने गिरीशला जॉब वरुन काढून टाकले होते. याच दोघांमध्ये आपला जॉब गेला आणि त्यामुळे आपल्यावर एक लाखापर्यंत कर्ज झालं असल्याचा आरोप व्हिडीओच्या माध्यमातून गिरीशने केला आहे. या बेरोजगारी आणि कर्जाच्या नैराश्यातून गिरीशने आपण आत्महत्या करत असल्याचं व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं आहे.
हेही वाचा -सखूबाईच्या धाडसाने कुटुंब सलामत, अंबरनाथमध्ये बिबट्याचा हल्ला महिलेने परतवला
नैराश्यातून आपल्यावर आत्महत्या करण्याची नामुष्की ओढवल्याचा आरोप गिरीशने केला आहे. आपण कोणाकडून किती कर्ज घेतले आहे याबाबत त्याने व्हिडीओ मध्ये स्पष्ट सांगितल आहे आणि त्या नैराश्यातून तो बदलापूर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानक दरम्यान ट्रेन खाली उडी घेऊन आत्महत्या करत असल्याचं गिरीशने सांगितलं आहे.
या घटनेत गिरीश याचा मृत्यू झाला असून कल्याण रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा नोंद केला असून पुढील तपास करत आहेत.
Recover your password.
A password will be e-mailed to you.