तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

वंशाला दिवा पाहिजे म्हणून बायकोला संपवलं, शॉक लागल्याचा रचला बनाव

0 30

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील दोनवडे येथे कौटुंबिक वादातून पतीने दोरीच्या साहाय्याने गळा आवळून पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अश्विनी एकनाथ पाटील (वय २८) असे विवाहितेचे नाव आहे. आज पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला असून मुलीच्या माहेरच्या नातेवाईकांनी मुलाविरोधात तक्रार दिली असून याप्रकरणी पोलिसांनी एकनाथ पाटील याला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी व एकनाथ या दाम्पत्याला दोन मुली आहेत. वंशाला दिवा म्हणून मुलगा नाही म्हणून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते. मुलगा व्हावा यासाठी पती एकनाथ याचा अट्टाहास होता. इतकच नाही तर अश्विनीचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला देखील केला जात होता. आज पहाटे अश्विनीची दोरीच्या साह्याने गळा आवळून एकनाथने हत्या केली.

आम्ही पोलीस आहोत, चौकशी करायची आहे; डोंबिवलीत अल्पवयीन मुलीसोबत घडली भयानक घटना

यानंतर तिचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याचा बनाव केला. मात्र, अश्विनीच्या माहेरच्या नातेवाईकांनी अश्विनीचा पती एकनाथ यानेच हत्या केल्याची तक्रार दिल्याने करवीर पोलिसांनी एकनाथची कसून चौकशी केली. एकनाथने अश्विनीच्या दोरीच्या साहाय्याने गळा आवळून हत्या केल्याचे कबूल केल्याने हा प्रकार उघडकीस आला. करवीरचे पोलीस उपनिरीक्षक निवास पाटील यांनी याबाबत माहिती दिली.

पार्टीला सांगा मला महाराष्ट्राचं पालक करा, सुमित्रा महाजनांचं राज्यपाल पदाबाबत मोठं विधान

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.