तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

डोळा लागला, नियंत्रण सुटलं, भरधाव कार बसवर आदळली, ४ जणांचा जागीच मृत्यू

0 53

मुंबई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार आणि बसच्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झालाय. डहाणूतील महालक्ष्मीजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघात जखमी झालेल्या प्रवाशांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातहून कार मुंबईच्या दिशेनं येत होती. डहाणूजवळ पोहोचले असता अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने विरोधी विरोधी दिशेनं येणाऱ्या भरधाव लक्झरी बसवर ही कार आदळली. पहाटे ५ वाजताच्या सुमारास डहाणूतील महालक्ष्मीजवळ हा भीषण अपघात झाला.

कारमधील चारही प्रवासी गुजरातच्या बारडोलीमधील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला आहे. कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला आहे.

(बातमी अपडेट होत आहे…)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.