Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पोलीस होऊन कुटुंबाची स्थिती सुधारायची होती, पण नियतीने घात केला अन् तरुणासोबत घडलं विपरीत

7

जळगावः पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या तरुणाचा रस्त्यावर धावतांना अपघाती मृत्यू झाला आहे. भडगाव तालुक्यातील कजगाव येथे सोमवारी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. रोहित अशोक मराठे (वय १८) असे मयत तरुणाचे नाव आहे. रस्त्यावर धावण्याचा सराव करतांना अज्ञात वाहनाच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला आहे.

कजगाव येथे रोहित अशोक मराठे हा कुटुंबियांसोबत वास्तव्यास आहे. रोहित याचे पोलीस होण्याचे स्वप्न असून पोलीस भरतीसाठी तो सराव करत होता. सोमवारी सकाळी रोहित हा नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांसोबत भडगाव रस्त्यावर धावण्याचा सराव करण्यासाठी गेला होता. यादरम्यान चाळीसगावकडून भडगावकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने रोहितला मागून जोरदार धडक दिली.

वाचाः VIDEO: पेटत्या निखाऱ्यावरुन चालण्याची शेकडो वर्षांची परंपरा; प्राचीन मंदिरात होते अग्नीपरीक्षा

वाहनाच्या जोरदार धडकेत रोहित मराठे याच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. यावेळी रोहित सोबत असलेल्या वैभव बोरसे, हर्षल पाटील, दत्तू महाजन या मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच दादाभाऊ पाटील, रवी मालचे, अशोक पाटील हे सुध्दा मदतीला धावले होते. जखमी रोहितला पुढील उपचारासाठी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून चाळीसगाव येथील रुग्णालयात दाखल केले होते. मात्र रस्त्यातच रोहितची प्राणज्योत मालवली होती. रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले.

वाचाः पठ्ठ्यानं करुन दाखवलं! शेतकरी कुटुंबातील मुलगा झाला RTO इन्स्पेक्टर

रोहितच्या मृत्येने कुटुंबियांसह मित्रांना मोठा धक्का

रोहित हा भडगाव येथील न्यू इंग्लिश माध्यमिक शाळेत बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. त्याचे कुटुंबिय शेती करुन आपला उदरनिर्वाह करतात. मयत रोहीत मराठे यांच्या पश्चात वडील, आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. रोहितचे पोलीस होण्याचे स्वप्न होते. पोलीस होऊन कुटुंबांची परिस्थिती सुधारावी अशी त्याची इच्छा होती. यासाठी तो आपल्या मित्रांसोबत सकाळी, सायंकाळी भरतीसाठी तसेच नित्याने व्यायामाचा सराव सुरू होता. मात्र अपघाताच्या रुपाने त्याच्यावर काळाने झडप घातली होती व पोलिस होण्याचे त्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.
रोहितच्या मृत्यूने त्याच्या मित्रांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान ग्रामीण भागात आजही सुसज्य अशी मैदाने नसल्याने मुले रस्त्यावर धावतात, व त्यात अशा अपघाताच्या घटना घडतात. त्यामुळे गावात क्रीडांगणे व्हावीत, जेणेकडून घटना टाळता येतील, अशी मागणी नागरिकांमधून तसेच तरुणांमधून केली जात आहे.

वाचाः मुंबईकरांचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास ८ तासांचा उशीर; ‘या’ वेळेत पूर्वपदावर येणार पाणीपुरवठा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.