Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शैलेश लोढा यांचा ‘तारक मेहता’च्या निर्मात्यांवर गंभीर आरोप, मालिका सोडल्यानंतर कलाकारांचे पैसे….

7

मुंबई: गेल्या १४-१५ वर्षे प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारी तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सध्या वेगळ्याच कारणांमुळं चर्चेत असते. मालिकेत आता नवीन काही राहिलं नाही, चांगले कलाकारही मालिका सोडून गेलेत,असं म्हणत प्रेक्षकांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली. तसंच मालिका सोडून गेलेले कलाकारही आता निर्मात्यांवरा टीका करताना दिसत आहेत.

गेल्या काही वर्षात अनेक महत्त्वाच्या कलाकारांनी मालिकेला राम-राम ठोकला यात दयाबेन साकारणारी, दिशा वकानी, तर खुद्द तारक मेहता साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांच्या नावाचा समावेश आहे.शैलेश लोढा यांनी मालिका सोडताना नाराजी व्यक्त केली. त्यानंतरही ते सतत निर्मात्यावर निशाणा साधताना दिसत आहेत.

कलाकारांचे पैसे थकवले

कलाकारांनी मालिका सोडून अनेक महिने झाल्यानंतरही निर्मात्यांनी त्यांना त्यांच्या हक्काचं मानधन दिलं नसल्याचं, शैलेश लोढा यांनी म्हटलं आहे. गेल्या १४ वर्षांपासून शैलेश लोढा या शोचा भाग होते.पण गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात त्यांनी अचानक मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आणि सगळ्यांना धक्का बसला. शैलेश लोढा यांचं गेल्या वर्षभराचं मानधन निर्मात्यांनी थकवलं असल्याचं म्हटलं जात आहे. ही अंदाजे सहा-आकडी रक्कम आहे. ते जवळपास एक वर्षापासून निर्मात्यांनी थकवलेलं मानधन देण्याची वाट पाहात आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सेटवर झालेल्या काही भांडणांमुळं शैलेश लोढा यांनी मालिका सोडली होती. यानंतर त्यांनी कोणतीही सूचना न देता मालिका सोडली. त्यानंतरही त्यांनी याबद्दल मौन बाळगलं आहे.

अशीही चर्चा सुरू आहे की, हे काय पहिल्यांदा होत नाहीये. शैलेश यांच्यासाखरंच अनेक कलाकार त्यांचं मानधन मिळण्याची वाट पाहत आहेत. मालिकेत अंजली भाभीची भूमिका साकारलेली अभिनेत्री नेहा मेहता हिनं देखील मालिका सोडली. तिचे देखील ३० ते ४० लाख रुपयांचं मानधन अद्यापही देण्यात आलं नाहीये. तसंच टप्पूची भूमिका साकारलेली राज अनाडकट याचेही पैसे निर्मात्यांनी दिले नसल्याचं म्हटलं जात आहे.

शैलेश पुढं म्हणाले की, त्यांनी लोढा यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी ‘काहीतरी नवीन सांगा’ असं म्हणत उपहासात्मक टिप्पणी केली. तर असितकुमार मोदी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.