
Tej Police Times
कलाकारांचे पैसे थकवले
कलाकारांनी मालिका सोडून अनेक महिने झाल्यानंतरही निर्मात्यांनी त्यांना त्यांच्या हक्काचं मानधन दिलं नसल्याचं, शैलेश लोढा यांनी म्हटलं आहे. गेल्या १४ वर्षांपासून शैलेश लोढा या शोचा भाग होते.पण गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात त्यांनी अचानक मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आणि सगळ्यांना धक्का बसला. शैलेश लोढा यांचं गेल्या वर्षभराचं मानधन निर्मात्यांनी थकवलं असल्याचं म्हटलं जात आहे. ही अंदाजे सहा-आकडी रक्कम आहे. ते जवळपास एक वर्षापासून निर्मात्यांनी थकवलेलं मानधन देण्याची वाट पाहात आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सेटवर झालेल्या काही भांडणांमुळं शैलेश लोढा यांनी मालिका सोडली होती. यानंतर त्यांनी कोणतीही सूचना न देता मालिका सोडली. त्यानंतरही त्यांनी याबद्दल मौन बाळगलं आहे.
अशीही चर्चा सुरू आहे की, हे काय पहिल्यांदा होत नाहीये. शैलेश यांच्यासाखरंच अनेक कलाकार त्यांचं मानधन मिळण्याची वाट पाहत आहेत. मालिकेत अंजली भाभीची भूमिका साकारलेली अभिनेत्री नेहा मेहता हिनं देखील मालिका सोडली. तिचे देखील ३० ते ४० लाख रुपयांचं मानधन अद्यापही देण्यात आलं नाहीये. तसंच टप्पूची भूमिका साकारलेली राज अनाडकट याचेही पैसे निर्मात्यांनी दिले नसल्याचं म्हटलं जात आहे.
शैलेश पुढं म्हणाले की, त्यांनी लोढा यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी ‘काहीतरी नवीन सांगा’ असं म्हणत उपहासात्मक टिप्पणी केली. तर असितकुमार मोदी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
Recover your password.
A password will be e-mailed to you.