
Tej Police Times
प्रेयसी फोन उचलत नाही म्हणून प्रियकर तापला, रस्त्यात गाठलं अन् विषारी औषध पाजलं
काही दिवस तेथे राहिल्यावर पुन्हा दोघेही औरंगाबादमधील बजाजनगर येथे राहायला आले. दरम्यान काही दिवसांपासून अंजलीचे पती आणि सासूमध्ये या ना त्या कारणाने खटके उडत होते. दरम्यान शनिवारी पुन्हा कुरबूर झाली. त्यानंतर अंजलीने थेट पोलीस ठाणे गाठले. तेथे पोलिसांनी दोन्ही परिवाराचे समुपदेशन केले. त्यानंतर अंजली सासरी न जाता आईसह माहेरी गेली.
दरम्यान नित्याप्रमाणे आई सकाळी कंपनीत कामाला गेली. दुपारी आईने अंजलीला अनेक कॉल केले, मात्र अंजली कॉल उचलत नसल्याने आईने शेजाऱ्यांना बघायला सांगितले. शेजाऱ्यांनी घराच्या फटीमधून पाहिले असता अंजलीने गळफास घेतल्याचे आढळून आले. याबाबत शेजाऱ्यांनी आईला घटनेची माहिती देत पोलिसांना पाचारण केले. तसंच अंजलीला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र लग्नाच्या अवघ्या तीन महिन्यातच अंजलीने जगाचा निरोप घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.