
Tej Police Times
ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत उर्मिला म्हणाली, ‘मी खूप स्ट्रगल केला. माझं आडनाव लोकप्रिय नव्हतं. माझ्या डोक्यावर कुणाचा हात नव्हता, माझी कुणाशीच ओळख नव्हती. मी एका सर्वसामान्य घरातली मुलगी होते. मला ‘नरसिंम्हा’ मिळाली कारण जिला घेतलं होतं तिला फ्रॅक्चर झालं. ५०० ज्युनिअर आर्टिस्टसोबत नाचायचं होतं. माझं नृत्य न बघताच मला नकार दिला गेला. माझ्याबद्दल मीडियामध्ये अनेक गोष्टी लिहिल्या गेल्या. चार वर्ष असंच सुरू होतं. नंतर ‘रंगीला’ आली आणि सगळं बदललं.’
‘रंगीला’ बद्दल म्हटलं गेलं की मी जे केलं ते सेक्स अपील होती. त्यात मी अभिनय केलाच नाही. जर असं होतं तर हाय रामा हे गाणं एका कलाकाराशिवाय कसं होऊ शकलं असतं? एवढा मोठा हिट दिल्यानंतरही पुरस्कार तर सोडाच पण माझ्याबद्दल एक चांगला शब्दपण बोलला गेला नाही. माझ्या कपड्यांचं कौतुक झालं, माझ्या केसांचं कौतुक झालं सगळ्यांना क्रेडिट मिळालं पण मला क्रेडिट नाही मिळालं.’
उर्मिला पुढे म्हणाली, ‘ज्या मुलीने १३ फ्लॉप चित्रपट दिले, जिच्याबद्दल म्हटलं जायचं की ती मुलांसारखी दिसते आणि हिरोसोबत डबल मिनिंग गाणी करते तिला अभिनेत्री म्हटलं जायचं. पण माझ्यासाठी कॅमेऱ्यासमोर असणं एक अध्यात्मिक अनुभव होता. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांची गाणी मी जगायचे. तेच माझ्यासाठी पुरस्काराप्रमाणे होतं . मला पुरस्कारांची गरज नव्हती.’
Recover your password.
A password will be e-mailed to you.