तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

बायकोची पर्स चोरल्याचा संशय, नवऱ्याने दोघांना कल्याणला उतरवलं, दोन दिवस घरात डांबलं

0 32

कल्याण : पत्नीची पर्स चोरी केल्याचा संशय घेत पतीने दोन सहप्रवाशांचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याण स्थानकात उतरवून दोघा जणांना दोन दिवस भिवंडीतील घरात डांबून ठेवलं. त्यांच्या सुटकेसाठी कुटुंबीयांकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचाही आरोप आहे.

आरोपी अझर शेख आताहूर रहमान हा आपल्या पत्नीसह जयनगर ते मुंबई पावन एक्स्प्रेसने प्रवास करत होते. याच रेल्वे डब्यातून सज्जात शेख आणि सजीज ही तरुण मुले देखील प्रवास करत होती.

प्रवासादरम्यान रहमान यांच्या पत्नीची पर्स गाडीतून चोरीला गेली होती. पर्समध्ये काही पैसे असल्याने सहप्रवासी असणाऱ्या सज्जात आणि सजीत शेख यांच्यावर अजर रहमान यांनी पर्स आणि पैसे चोरी केले असल्याचा संशय व्यक्त केला.

इतकेच नव्हे तर अझरने कल्याण स्थानकात दोघांना उतरवत या दोघांनाही थेट भिवंडी येथील एका घरात घेऊन गेला. दोघांना त्या घरात त्याने दोन दिवस डांबून ठेवले. एवढेच नाही तर त्यांच्या सुटकेसाठी त्यांच्या घरच्यांकडून ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचाही आरोप आहे.

हेही वाचा : गर्लफ्रेण्ड दुसऱ्या पोराबरोबर दिसली, मुंबईकर तरुणाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात सगळं संपवलं

नातेवाईकांना अपहरणाची माहिती मिळताच नातेवाईकांनी मुंबईतील नागपाडा पोलीस ठाण्यात हे गुन्हा दाखल केला आणि त्या नंतर पोलिसांनी या दोघांची सुटका केली. ही तक्रार कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे.

सध्या पोलिसांनी आरोपीला अटक करत पुढील तपास सुरू केला आहे, असे कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी सांगितले.

हेही वाचा : त्याची चिता जळत असतानाच वाईट बातमी धडकली, गावातल्याच आणखी तिघांचा अपघातात मृत्यू

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.