Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

वयाने मोठ्या ऐश्वर्या रायच्या प्रेमात पडलेला अभिषेक; फिल्मी आहे ज्युनिअर बच्चनची लव्हस्टोरी

9

मुंबई: बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा ४६ वा वाढदिवस. महानायकाचा मुलगा असूनही अभिषेकचा मनोरंजन विश्वातील प्रवास अजिबात सोपा नव्हता. पहिलाच सिनेमा अपयशी ठरल्यानंतर अभिषेक निराश झाला नाही तो जिद्दीनं काम करत राहिला. अखेर अभिषेकनं बॉलिवूडमध्ये स्वतःची अशी ओळख निर्माण केली. मनोरंजन विश्वातील या प्रवासामध्ये अभिषेकला ऐश्वर्या राय हिच्यासारखी आयुष्याची साथीदार म्हणून लाभली. आज वाढदिवसानिमित्त जाणून घ्या अभिषेकच्या आयुष्याविषयी…

विमा एजंट म्हणून केलं होतं काम

अभिनेता अभिषेक बच्चन बॉलिवूमध्ये येण्याआधी विमा एजंट म्हणून काम केलंहोतं. परंतु नंतर त्यानं बॉलिवूडमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. अभिनेता होण्याबरोबरच अभिषेक हा उत्तम गायक देखील आहे. त्यानं २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ब्लफमास्टर’ सिनेमात गाणं देखील गायलं होतं. याशिवाय तो रॅप देखील उत्तम गातो.


अभिषेकनं २००० मध्ये रिफ्युजी सिनेमातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. परंतु हा सिनेमा अपयशी ठरला. त्यानंतर अभिषेकच्या खात्यामध्ये जास्तीत जास्त फ्लॉप सिनेमेच आले. इतकं अपयश मिळूनही अभिषेक घाबरला नाही, निराशा झाला नाही. उलट अधिक जिद्दीनं तो काम करत राहिला. त्यानं आवाहनात्मक भूमिका देखील स्वीकारल्या. युवा, गुरू सारखे सिनेमे त्यानं केले. यामध्ये नेहमीपेक्षा वेगळ्या पठडीच्या भूमिका साकारल्या. आजही एक संयमी आणि गुणी अभिनेता म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं.

जन्मदाखल्यावर अभिषेकचं नाव

अभिषेक बच्चन याच्या जन्माच्या दाखल्यावरील नाव वेगळंच आहे. अमिताभ यांनी त्यांच्या लाडक्या मुलाचं जन्म दाखल्यावर नाव बाबा बच्चन असं लिहिलं आहे.


अभिषेकच्या आयुष्यात विश्वसुंदरीचा प्रवेश

अभिषेक बच्चन जेव्हा मनोरंजन विश्वामध्ये धडपडत होता. तेव्हा ऐश्वर्या हिंदी सिनेमात प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जात होती. अभिषेक आणि ऐश्वर्याची पहिली भेट १९९९ मध्ये झाली. त्यावेळी हे दोघंजण त्यांच्या ‘ढाई अक्षर प्रेम के’ या सिनेमाच्या फोटोशूटसाठी एकत्र आले होते. हा सिनेमा २००० मध्ये प्रदर्शित झाला. हा त्या दोघांचा पहिला सिनेमा होता. सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतरही ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यात मैत्री कायम राहिली होती.


‘ढाई अक्षर प्रेम के’ सिनेमानंतर ऐश्वर्या आणि अभिषेकनं रोहन सिप्पी यांच्या ‘कुछ ना कहो’ सिनेमात काम केलं. हा सिनेमा २००३ मध्ये प्रदर्शित झाला. त्या सिनेमाच्यावेळी त्या दोघांच्या मनात एकमेकांबद्दल काही भावना निर्माण झाल्या होत्या. ऑफ्रा विन्फ्रेच्या कार्यक्रमात अभिषेकनं सांगितलं होतं की,’मी जेव्हा न्यू यॉर्कला सिनेमाच्या चित्रीकरणासाठी गेलो होतो. तेव्हा हॉटेलमध्ये बाल्कनीमध्ये उभा राहून ऐश्वर्याचाच विचार करत होतो. त्यानंतर मी तिला एकेदिवशी घेऊन त्याच बाल्कनीमध्ये आलो आणि तिला लग्नाची मागणी घातली. विशेष म्हणजे ऐश्वर्यानं मला लगेचच होकार दिला’. अभिषेकनं तीन वर्षांनी मोठ्या असलेल्या ऐश्वर्याबरोबर २० एप्रिल २००७ मध्ये लग्न केलं.



Source link

Leave A Reply

Your email address will not be published.