Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सातारा येथील खानापूर (ता. वाई) येथील २२ वर्षाच्या एका युवकाचा परखंदी – शेंदूरजणे गावाच्या सीमेवर असलेल्या एका शेतात दगडाने व तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आल्याचं उघडकीस आले. अभिषेक रमेश जाधव असं मृत तरुणाचं नाव आहे. बहिणीबरोबर असलेल्या प्रेम प्रकरणातून गावातील मित्रानेच ही हत्या करून त्याचा काटा काढला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं होत.
रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णेबंदर इथे दोन दिवसांपासून भुईंज पोलीस ठाण्याचे सोमनाथ बल्लाळ, रविराज वर्णेकर, मोहिते आणि एलसीबीचे सचिन ससाणे, धिरज महाडीक हे सर्व वेषांतर करून सापळा लावून बसले होते. त्यावेळी तपास कामातील तांत्रिक बाबींचा वापर करून अखेर शनिवारी दुपारच्या सुमारास आरोपी रहीम मुलाणी व प्रज्वल जाधव व अन्य एक संशयित आरोपीला झडप घालून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
सातारा जिल्हा व राज्यासह परराज्यातील गुन्हेगारांचे कर्दनकाळ असलेले भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रमेश गर्जे यांनी जिल्हा पोलिसप्रमुख समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा तपास तात्काळ होण्यासाठी पोलीस पथके तयार केली होती. या तपास कामात अवघ्या तीस तासात यश प्राप्त केल्याबद्दल जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, वाईच्या डिवायएसपी शितल जानवे खराडे, वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक बाळासाहेब भरणे, भुईंजचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रमेश गर्जे, आशीष कांबळे, महिला पिएसआय स्नेहल सोमदे तसेच दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू नलावडे व उपनिरीक्षक अशोक गायकवाड यांचीही सातारा पोलिसांच्या पथकाला मोठी मदत झाली.