
Tej Police Times
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांना कोल्हापुरी बंधाऱ्याचे देयक एकूण १ कोटी ३७ लाख रुपये काढायचे होते.यासाठी ७.५ टक्के प्रमाणे ८,०३,२५० रुपये स्वतःसाठी व महामंडळ कार्यालयाचे मिळून ५० हजार रुपये असे एकूण ८ लाख ५३ हजार २५० रुपयाची लाचेची मागणी तक्रारदाराकडे करण्यात आली होती. मात्र, तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी औरंगाबाद लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क करून तक्रार दिली.
विभागाकडून तक्रारीची शहानिशा करण्यासाठी अगोदर लाच मागणी पडताळणी करण्यात आली. त्यानंतर पथकाकडून सापळा रचण्यात आला. आरोपी यांनी त्यांच्या सोबत असलेली गाडी (एम एच.-२० एफ जी.५००५) मध्ये तक्रारदारांकडून लाचेची रक्कम स्वीकारली. दबा धरून बसलेल्या एसीबी अधिकाऱ्यांनी लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक केली. या घटनेमुळे औरंगाबाद शहरात एकच खळबळ उडाली आहे
सोनं, गाड्या ते जमीन, सत्यजीत तांबे ते धीरज लिंगाडे, विधानपरिषदेच्या नव्या आमदारांची संपत्ती किती?
जालना युनिटची औरंगाबाद शहरात कारवाई
परभणी आणि पुर्णा येथे कोल्हापूरी बंधाऱ्याचे काम झाल्यानंतर या कामाचे कोटयावधीचे बील काढण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक यांची ७.५ टक्केची लाच तसेच कार्यालयाच्या लोकांसाठी पन्नास हजार रूपये असे साडे आठ लाख रूपयांची लाच घेताना जलसंधारण महामंडळाचे उपविभागीय अधिकारी ऋषीकेश प्रल्हादराव देशमुख (वय ३४) आणि भाऊसाहेब दादाराव गोरे (लिपिक, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ कार्यालय) या दोघांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे लाच लुचपत विभागामधील जालना युनिटने औरंगाबाद शहरात ही यशस्वी कारवाई केली आहे.
फॉर्म अन् कागदपत्रं तयार, भाजप टिळकांना उमेदवारी द्यायला तयार, पण एक अट: चंद्रशेखर बावनकुळे
टक्केवारी घेताना अडकलेल्या लाचखोर अधिकाऱ्याला भेटण्यासाठी राजकीय मांदियाळी?
लोकप्रतिनिधींवर नेहमीच कामाची टक्केवारी घेतल्याचा आरोप करण्यात येतो. काही आरोप हे राजकीय हेतूने देखील केले जातात. मात्र, आज एका वरिष्ठ पातळीवरील अधिकारी रंगेहाथ तब्बल आठ लाख रुपयाची लाच घेताना एसीबीच्या पथकाने अटक केलं आहे. अटकेच्या काही तासानंतरच जिल्ह्यातील अनेक जि.प.सदस्य, विविध राजकीय नेते यांची औरंगाबाद मधील एसीबी कार्यालयात गर्दी करताना दिसत आहेत.यामध्ये जवळपास सर्वच राजकीय पक्षातील लोकप्रतिनिधी पाहायला मिळाले. रात्री उशिरापर्यंत ही राजकीय नेत्यांची मांदियाळी कार्यालय परिसरात होती.
तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची चिंता मिटली, ‘शासन आपल्या दारी’ येणार, महसूल विभाग गावातच दाखले देणार
अधिकृत घोषणा होण्याआधीच विक्रम काळेंनी केला विजय घोषित
Recover your password.
A password will be e-mailed to you.