
Tej Police Times
क्लिक करा आणि वाचा- VIDEO : डोकंच चक्रावतं! चक्क उंदराने चोरला महागडा हिऱ्याचा हार, पाहा कशी केली चोरी
विखे पाटील यांनी दिला इशारा
तुम्ही काँग्रेस पक्षाला सोयीनुसार वापरू शकत नाही. नेमकी काय भूमिका घ्यावी याबाबत मुळातः थोरात व्यथित झाले आहेत. त्यांच्या संगमनेर तालुक्यातील जनता त्यांना सोडून चालली आहे. त्यांच्या तालुक्यातील चार महत्वपूर्ण गावांच्या ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपला मोठे यश मिळाले त्यामुळेच थोरात व्यथित झाले आहेत. वाळू माफीयांवरील कारवाईचे राजकीय भांडवल करून तुम्ही जनतेला भावनिक साद घालत असाल तर जनता एवढी दूधखुळी नाही, असा इशाराही विखे पाटील यांनी दिला आहे.
क्लिक करा आणि वाचा- विश्वासू ड्रायव्हरला शिकवायचा होता मालकाला धडा, बेडरूमची डुप्लिकेट चावी बनवून साधला डाव, फुटले बिंग
वाळू माफिया आणि ठेकेदारांनी काढलेल्या मोर्चाला दवाखान्यात असतानाही फोनवरून तुम्ही मार्गदर्शन करता मग पदवीधर निवडणुकीत सुध्दा महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत भूमिका का स्पष्ट का केली नाही? याबाबतही थोरातांनी बोलले पाहिजे, असे विखे पाटील म्हणाले. सत्यजित तांबेंबाबतचा विषय संपला कारण आता निवडणूकही संपली आहे. भाजपने दिलेल्या पाठींब्यामुळे निवडून आले. उद्याच्या काळात त्यांनी पक्षाच्या भूमिकेसोबत राहावे एवढीच आमची अपेक्षा आहे, असेही विखे-पाटील यांनी स्पष्ट केले.
क्लिक करा आणि वाचा- डॉक्टर नव्हे हैवान! ऑपरेशनच्या नावाखाली गुपचूप काढल्या दोन्ही किडन्या, पीडित महिलेची मृत्यूशी झुंज सुरू
जितेंद्र आव्हाड यांना टोला
राष्ट्रवादीचे आमदार म्हणून जितेंद्र आव्हाड हे सातत्याने आपली भूमिका स्पष्ट करीत असतात. ते शरद पवार यांच्या जवळचे आणि विश्वासू नेते आहेत. त्यामुळे त्यांनी आता त्यांनी मांडलेली भूमिका ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मान्य आहे का? हे पण तपासून घेतले पाहिजे, असेही विखे पाटील म्हणाले.
Recover your password.
A password will be e-mailed to you.