
Tej Police Times
यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्ही टिळक घराण्यातील व्यक्तीला उमेदवारी देण्यास तयार असल्याचे सांगितले. उद्या तीन वाजेपर्यंत महाविकास आघाडीने कसब्याची निवडणूक बिनविरोध केली तर आम्ही उद्या हेमंत रासने यांना उमेदवारी अर्ज मागे घेऊ. एका वर्षासाठी जनतेवर निवडणूक लादू नये. त्यामुळे काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यावा. आमची कागदपत्रं तयार आहेत, फॉर्म तयार आहेत. टिळक परिवाराला आम्ही उमेदवारी द्यायला तयार आहे पण त्यांच्याकडून (महाविकास आघाडी) तसे पाऊल उचलले जावे. कुणाल टिळक, गणेश बिडकर, धीरज घाटे हे सगळेच ताकदवान उमेदवार आहेत. पण एका जागेवरून सर्वजण लढू शकत नाहीत. यापैकी कोणीही उभे राहिले तरी १०० टक्के निवडून येईल. त्यामुळे टिळक परिवार किंवा कोणालाही डावलण्याचा प्रश्नच येत नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Recover your password.
A password will be e-mailed to you.