Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

स्टार झाल्यानंतर अमिताभ सगळं विसरला, तो कुणालाही… सलीम खान यांच्या वक्तव्याची चर्चा

20

मुंबई: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याबद्दल लेखक, दिग्दर्शक सलिम खान यांनी एक वक्तव्य केलंय, त्यामुळं चर्चेला उधाण आलं आहे. सलीम यांचा मुलगा अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अरबाज खान याचा ‘द इन्व्हिजिबल विथ अरबाज खान’ या शोची सध्या बरीच चर्चा सुरू आहे. अरबाजच्या या शोमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावणार आहे. या शोचे पहिले पाहुणे म्हणून सलीम खान आले होते. याशोमध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से , अनुभव शेअर केलेत. सलीम खान यांनी अमिताभ यांच्याबद्दल असं काही सांगितलंय की त्याची चर्चा सुरू आहे.

सुरुवातील सलीम खान आणि अमिताभ बच्चन यांच्यात चांगली मैत्री होती, पण अमिताभ यांनी ही मैत्री जशी जपायला हवी होती, तशी जपली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ‘जंजीर’ या चित्रपटातून सलीम आणि बच्चन यांनी एकत्र काम केलं. यानंतर अमिताभ बच्चन यशाच्या शिखरावर पोहोचले. सुपरस्टार झाले. पण त्यानंतर सलीम आणि बच्चन यांच्या मैत्रीत मात्र फूट पडली. दोघांच्या मैत्रीत दुरावा आला. सलीम खान आणि अमिताभ यांच्या मैत्री तुटली, त्यामागं अनेक कारणंही आहेत.

अरबाजसोबत गप्पा मारताना सलीम यांनी अमिताभ यांच्या मैत्रीबद्दलही सांगितलं. सलीम म्हणाले की, ‘अमिताभला माझ्यामुळं ‘जंजीर’ चित्रपट मिळाला होता. जंजीरमुळं तो सुपरस्टार झाला. यानंतर त्यानं माझ्यासोबत बोलणंही सोडून दिलं …असं सलीम यांनी सांगितलं. जसं जसं अमिताभला मोठे चित्रपट मिळत गेले, तो मला विसरत गेला. तो सहसा कुणालाही जवळ येऊ देत नाही. यश मिळाल्यानंतर ज्यांनी या प्रवासात पाठिंबा दिला, त्यांना न विसरता त्यांच्यासोबत नातं टिकवणंही गरजेचं असल्याचंही सलीम यांनी म्हटलं.

अमिताभ यांच्यामुळं तुटली सलीम- जावेद यांची जोडी
जावेद अख्तर आणि सलीम खान हे एकेकाळी अतिशय ख्यातनाम पटकथा लेखक म्हणून ओळखले जायचे. या जोडीनं लिहिलेले अनेक सिनेमे लोकप्रिय झाले. त्यांच्या पटकथा असलेल्या सिनेमांनी हिंदी सिनेमाविश्वात नवीन इतिहास घडवला. परंतु जेव्हा या जोडीनं विभक्त होण्याचा निर्णय घेतला तेव्हा इंडस्ट्रीमधील सर्वांना मोठा धक्का बसला. त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार ही जोडी विभक्त होण्यामागचं कारण दुसरं तिसरं कुणी नाही तर खुद्द अमिताभ बच्चन असल्याचं समोर आले होतं.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.