
Tej Police Times
अरबाजसोबत गप्पा मारताना सलीम यांनी अमिताभ यांच्या मैत्रीबद्दलही सांगितलं. सलीम म्हणाले की, ‘अमिताभला माझ्यामुळं ‘जंजीर’ चित्रपट मिळाला होता. जंजीरमुळं तो सुपरस्टार झाला. यानंतर त्यानं माझ्यासोबत बोलणंही सोडून दिलं …असं सलीम यांनी सांगितलं. जसं जसं अमिताभला मोठे चित्रपट मिळत गेले, तो मला विसरत गेला. तो सहसा कुणालाही जवळ येऊ देत नाही. यश मिळाल्यानंतर ज्यांनी या प्रवासात पाठिंबा दिला, त्यांना न विसरता त्यांच्यासोबत नातं टिकवणंही गरजेचं असल्याचंही सलीम यांनी म्हटलं.
अमिताभ यांच्यामुळं तुटली सलीम- जावेद यांची जोडी
जावेद अख्तर आणि सलीम खान हे एकेकाळी अतिशय ख्यातनाम पटकथा लेखक म्हणून ओळखले जायचे. या जोडीनं लिहिलेले अनेक सिनेमे लोकप्रिय झाले. त्यांच्या पटकथा असलेल्या सिनेमांनी हिंदी सिनेमाविश्वात नवीन इतिहास घडवला. परंतु जेव्हा या जोडीनं विभक्त होण्याचा निर्णय घेतला तेव्हा इंडस्ट्रीमधील सर्वांना मोठा धक्का बसला. त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार ही जोडी विभक्त होण्यामागचं कारण दुसरं तिसरं कुणी नाही तर खुद्द अमिताभ बच्चन असल्याचं समोर आले होतं.
Recover your password.
A password will be e-mailed to you.