
Tej Police Times
खरी युती तर इकडे झाली! स्नेहल शिदम महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याच्या प्रेमात?
बालगंधर्व आणि शंकर महाराजांची भेट कशी घडली?, तो अविस्मरणीय प्रसंग काय होता? आदी कथा मालिकेत उलगडणार असल्याचं कळतंय. या भूमिकेविषयी अभिजीतनं सांगितलं, ‘मला या भूमिकेविषयी विचारल्यावर मी लगेच होकार कळवला.
मी ‘बालगंधर्व’ या सिनेमात एक वेगळी भूमिका केली होती. त्यावेळी शंकर महाराज आणि बालगंधर्व यांच्यात काही नातं होतं हे मला माहीत नव्हतं. मालिकेच्या निमित्तानं मला ते कळलं. चित्रपटात काम करत असताना मला कधीतरी बालगंधर्व ही भूमिका करायला मिळेल असं वाटलं होतं. ते आता मालिकेच्या निमित्तानं प्रत्यक्षात घडतंय. एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व साकारायला मिळणं हे स्वप्नवत आहे. माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे.’
प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर यांची हात जोडून जाहीर माफी, काय घडलं नेमकं?
श्री शंकर महाराज यांच्या बालपणापासूनच श्री स्वामी समर्थांचा त्यांच्यावर कृपाशीर्वाद होता, तसाच कृपाशीर्वाद श्री शंकर महाराजांचा त्यांच्या भक्तांवर आहे,असं म्हणतात. मालिकेबद्दल बोलायचं झालं तर, मालिकेत बालकलाकार आरुष बेडेकर यानं शंकर महाराजांचं बालपण साकारलं होतं. त्याचा अभिनयही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला . मात्र आता मालिका पुढे सरकत आहे. शंकर महाराजांच्या बाललीला दाखवल्यानंतर आता त्यांच्या साधनेची वेळ जवळ आली आहे. त्यामुळंच मालिकेनं आता काही वर्षांची लीप घेतला आहे. मालिकेत आता मोठे शंकर महाराज दिसत आहेत. मालिकेत मालिकेत मोठ्या शंकर महाराजांची भूमिका अभिनेता संग्राम समेळ साकारत आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.