तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

तो बाईकवरुन आला आणि माझ्या कपाळावर सिंदूर लावलं..सौम्यानं सांगितली छेडछाडीची भयंकर घटना

0 64

मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘भाबीजी घर पर है’ या मालिकेतून अनिता भाभी ही भूमिका घरघरात लोकप्रिय झाली. ही भूमिका अभिनेत्री सौम्य टंडन हिनं साकारली होतकी. आज भलेही सौम्या अभिनयापासून दूर आहे. तिनं २०२० मध्ये सौम्यानं ‘भाबीजी’ मालिकेला अलविदा केलं. कार्यक्रमामुळे सौम्या टंडनला प्रचंड लोकप्रियता मिळाली. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण सौम्याचे चाहते झाले. परंतु खूप कमी जणांना माहिती आहे की सौम्याला ती लहान असताना अतिशय भीषण अनुभव आले आहेत. तिला छेडछाडीचा अनुभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्या घटनांमुळे सौम्याच्या आयुष्यावर परिणाम झाला होता. परंतु त्या घटनेमुळे ती प्रचंड घाबरली होती. एका मुलाखतीमध्ये सौम्यानं या घटनांचा उल्लेख केला होता.

काय म्हणाली सौम्या
‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या एका मुलाखतीत सौम्या टंडनने तिच्या बाबतीत घडलेल्या छेडछाडीच्या घटनेचा खुलासा केला आहे. मध्यप्रदेश भोपाळमध्ये जन्मलेल्या सौम्याला शालेय वयात आलेले काही भीषण अनुभव सांगितले. भोपाळमधून उज्जैनमध्ये कुटुंब राहायला आल्यानंतर तिचं संपूर्ण शालेय शिक्षण तिथेच झालं.

मुलाखतीमध्ये सौम्यानं सांगितंल की, ‘एक दिवस मी रात्री घरी परतत होते, तेव्हा एका भरधाव एक मुलगाबाईकवर आला, त्यानं माझ्या पुढ्यात ती बाईक थांबवली, त्यानं माझ्या कपाळावर कुंकू (सिंदूर) लावलं आणि तो तिथून निघून गेला.’ या घटनेचा सौम्यावर चांगलाच परिणाम झाला. केवळ इतकंच नाही तर सौम्या एकदा सायकलवरून शाळेतून घरी परतत होती तेव्हा एका मुलानं तिला ओव्हरटेक केलं तेव्हा ती सायकलवरून पडली होती. पडल्यावर तिचा हात मोडला आणि तिथे तिची मदत करायला कुणीच आलं नसल्याचाही सौम्यानं खुलासा केला. त्यानंतर उज्जैनमध्ये राहताना सौम्या स्वतःच स्वतःची काळजी घ्यायला शिकली. बऱ्याचदा रस्त्यांवर मुलं तिचा पाठलाग करायचे तर भिंतींवर तिच्याविषयी अश्लील गोष्टी लिहायचे हेदेखील सौम्यानं या मुलाखतीमध्ये सांगितलं.


सप्तपदी होताच कियाराच्या पाया पडायला वाकला सिद्धार्थ; कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक
‘भाभीजी घर पर है’ या मालिकेमुळे सौम्याला लोकप्रियता मिळाली. शाहिद कपूर आणि करीना कपूरच्या ‘जब वी मेट’ सिनेमाही तिने छोटी भूमिका केली होती. याचवेळी सौम्यानं तिच्या संघर्षाबद्दल देखील सांगितलं. अतिगोऱ्या रंगामुळे तिला अनेकदा ऑडिशन दिल्यानंतर नाकारण्यात आलं होतं. कारण ती भारतीय वाटत नसल्याचं कारण अनेकांनी दिलं.



Source link

Leave A Reply

Your email address will not be published.