
Tej Police Times
कियारा आणि सिद्धार्थचं लग्न लावून देणाऱ्या गुरुजींनी मीडियाशी चर्चा केली. यावेळी त्यांनी सांगितलं, की या दोघांची जोडी अतिशय सुंदर आहे. या दोघांचे धर्म आणि लोकांसाठीचे विचार चांगले आहेत. दोघं अतिशय दिलदार असून मुख्य म्हणजे यांचे पाय जमिनीवर आहेत. अतिशय गोड जोडपं असल्याचं गुरुजींनी मीडियाशी बोलताना सांगितलं. तसंच त्यांनी सिद्धार्थ आणि कियाराला नेहमी सुखी, आनंदी राहण्याचा आशीर्वादही दिला.
सिद्धार्थ आणि कियाराचं लग्न सनातन धर्मानुसार झालं. यावेळी गुरुजींनी त्यांना सिद्धार्थ – कियाराचं लग्न लावल्यानंतर किती दक्षिणा मिळाली असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितलं, की एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जमीन, संपत्ती, इन्कम हे खिशात ठेवलं जातं, पण दक्षिणा ही एक भावना आहे, ती कधीही सांगतली जाऊ शकत नाही.
हेही वाचा – सप्तपदी होताच कियाराच्या पाया पडायला वाकला सिद्धार्थ; कारण वाचून कराल कौतुक
मुंबई – दिल्लीत होणार रिसेप्शन
७ फेब्रुवारीला जैसलमेरमध्ये लग्न झाल्यानंतर आता हे बॉलिवूड कपल खास इंडस्ट्रीतील लोकांसाठी रिसेप्शन देणार आहे. पहिलं रिसेप्शन दिल्ली ९ फेब्रुवारी रोजी आहे. तर दुसरं रिसेप्शन मुंबईत १२ फेब्रुवारी रोजी असणार आहे. सिद्धार्थ मल्होत्राचं कुटुंब दिल्लीत राहतं. तर मुंबईत सर्व बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत. त्यामुळे मुंबईतही खास रिसेप्शन देण्यात येणार आहे.
हेही वाचा – सिंदूर, मंगळसूत्र, लाल चूडा, कियाराचा लग्नानंतर खास लूक;दिल्लीत नवं दाम्पत्याचं खास स्वागत
२०२१ पासून एकत्र
२०२१ मध्ये कियारा – सिद्धार्थची लव्ह स्टोरी सुरू झाली होती. शेहशाह सिनेमावेळी या दोघांचं नातं खुललं. रील लाइफमध्ये सुपरहिट ठरलेली ही जोडी आता रिअल लाइफमध्येही एकत्र आली आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.