
Tej Police Times
कर्जत तालुक्यातील चांधई खुर्द येथील राहणारे दीपक बबन कोळंबे मंगळवार संध्याकाळी ७ वाजल्यापासून घरी आला नव्हता. संध्याकाळी ७ वाजता घरी फोन केला होता, तो त्याचा अखेरचा फोन ठरला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी संध्याकाळी तासगावकर कॉलेजमध्ये जाणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उल्हास नदी शेजारील पुलाजवळील वळणावर संशयास्पदरित्या दुचाकी वाहन असल्याचं दिसले. यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी पोलिसांना तात्काळ या घटनेची माहिती दिली. त्यानंतर कर्जत पोलिसांचं पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं.
या तरुणाचा अपघात झाला की घातपात, याबद्दल गावातील लोकांनी संशय व्यक्त केला आहे. दीपकच्या डोक्यावर गंभीर जखमेचे घाव असून तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यामुळे या प्रकरणी हा अपघात की हत्या याचं गुढ वाढलं आहे. घटनास्थळी पोलिसांनी ५ वाजता पोहचल्यानंतर सदर जागेची पाहणी केली आणि मृतदेहाचा पंचनामा केला.
यावेळी चांधई येथील माजी पोलीस पाटील गणपत कोळंबे, पोलीस पाटील सचिन कोळंबे, तसेच उत्तम कोळंबे, सुनील रसाळ, संतोष कोळंबे राम कोळंबे, पांडुरंग बागडे आदीनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृतदेहाचा पंचनामा पोलीस प्रशासनाने करून पुढील शवविच्छेदनासाठी मृतदेह नेरळ येथील सरकारी दवाखान्यात पाठविण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर, डी वाय एस पी विजय लगारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे, पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे, पोलिस रुपेश म्हात्रे, पी एस आय शिंदे आदी उपस्थीत होते.
Recover your password.
A password will be e-mailed to you.