तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

कर्जतमध्ये २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; डोक्यावर गंभीर जखम, पोलिसांना वेगळाच संशय

0 73

रायगड: कोकणात रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील चांधई खुर्द या गावातील २५ वर्षे युवकाचा मृतदेह उल्हास नदीजवळ आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे या तरुणाचा मृत्यू हा अपघात आहे की घातपात असा संशय ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आला आहे. कर्जत पोलिसांनी या सगळ्या घटनेचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे.

कर्जत तालुक्यातील लहान चांधई तरुण दीपक बबन कोळंबे असं या २५ वर्षीय युवकाचं नाव आहे. उल्हास नदीजवळ असलेल्या पुलाजवळील वळणावर हा मृतदेह सापडला आहे आणि पोलिसांनी या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला आहे.

कर्जत तालुक्यातील चांधई खुर्द येथील राहणारे दीपक बबन कोळंबे मंगळवार संध्याकाळी ७ वाजल्यापासून घरी आला नव्हता. संध्याकाळी ७ वाजता घरी फोन केला होता, तो त्याचा अखेरचा फोन ठरला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी संध्याकाळी तासगावकर कॉलेजमध्ये जाणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उल्हास नदी शेजारील पुलाजवळील वळणावर संशयास्पदरित्या दुचाकी वाहन असल्याचं दिसले. यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी पोलिसांना तात्काळ या घटनेची माहिती दिली. त्यानंतर कर्जत पोलिसांचं पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं.

या तरुणाचा अपघात झाला की घातपात, याबद्दल गावातील लोकांनी संशय व्यक्त केला आहे. दीपकच्या डोक्यावर गंभीर जखमेचे घाव असून तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यामुळे या प्रकरणी हा अपघात की हत्या याचं गुढ वाढलं आहे. घटनास्थळी पोलिसांनी ५ वाजता पोहचल्यानंतर सदर जागेची पाहणी केली आणि मृतदेहाचा पंचनामा केला.

यावेळी चांधई येथील माजी पोलीस पाटील गणपत कोळंबे, पोलीस पाटील सचिन कोळंबे, तसेच उत्तम कोळंबे, सुनील रसाळ, संतोष कोळंबे राम कोळंबे, पांडुरंग बागडे आदीनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृतदेहाचा पंचनामा पोलीस प्रशासनाने करून पुढील शवविच्छेदनासाठी मृतदेह नेरळ येथील सरकारी दवाखान्यात पाठविण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर, डी वाय एस पी विजय लगारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे, पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे, पोलिस रुपेश म्हात्रे, पी एस आय शिंदे आदी उपस्थीत होते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.