
Tej Police Times
वाचा: ‘राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार यात काहीच शंका नाही’
‘पोलीस यंत्रणेचं कधी नव्हे इतकं खच्चीकरण ठाकरे सरकारच्या काळात झालं आहे. अधिकऱ्यांमध्ये वॉर सुरू आहे. बार, पब, डिस्को, लेडीज बार आणि काळे धंदे राजरोस सुरू आहेत. दलालांमार्फत बदल्या आणि बदल्यांची दलाली घेणे सुरू आहे. आता चाईल्ड प्रोनोग्राफी सारखे भयंकर प्रकार उघड होत आहेत,’ असंही ते म्हणाले.
‘राज्यातील प्रशासकीय यंत्रणा पुरती कोलमडली आहे. आएएस दर्जाचे अनेक वरिष्ठ अधिकारी अनेक दिवस नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत तर सतत बदल्या करून अधिकाऱ्यांचं मनोधैर्य खच्ची करण्यात आलं आहे. ‘तीन कारभारी आणि रोज बदला अधिकारी’ अशी राज्याची स्थिती असल्याचा टोला शेलार यांनी हाणला.
वाचा: राहुल गांधींचा हात संजय राऊतांच्या खांद्यावर; भाजपची ‘ही’ प्रतिक्रिया
‘कुणी कुणाचे ऐकत नाही. राज्य शासनाच्या दिशाहीन कारभारामुळं राज्याची दिशा कोणती हेच कळत नाही. सत्तेतील तीन पक्ष एकमेकांशी भांडतात. एकमेकांच्या पक्षप्रमुखांविषयी वक्तव्य येतात, त्यावरून वाद होतात. तीनही पक्षांमध्ये बेदिली माजलेली आहे, यातून नेतृत्वाची बेअदबी होत आहे,’ याकडं शेलार यांनी लक्ष वेधलं.
Recover your password.
A password will be e-mailed to you.