तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

SSC HSC Exam: दहावी, बारावी परीक्षेसंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या

0 62

SSC HSC Exam: राज्य मंडळामार्फत २१ फेब्रुवारी आणि २ मार्चला घेतल्या जाणाऱ्या अनुक्रमे दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये गैरमार्गरहीत परीक्षा घेणे, हेच यंदाचे मुख्य लक्ष्य असल्याची माहिती मंडळाच्या नाशिक व मुंबई विभागाचे अध्यक्ष नितीन उपासनी यांनी ‘मटा’शी बोलताना दिली. त्या दृष्टीने सर्व स्तरावर तयारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कोव्हिडनंतर पहिल्यांदाच या परीक्षांचे नियोजन पूर्वीप्रमाणे करण्यात आले असून, त्यानिमित्त उपासनी यांच्याशी साधलेला हा संवाद…

परीक्षेच्या नियोजनात यंदा प्रमुख भर कशावर आहे?

-परीक्षेची गोपनीयता राखण्यासाठी तसेच गैरमार्गरहीत परीक्षा पार पाडण्यासाठी मंडळाने यंदा तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. रनरच्या लोकेशनची माहिती मिळावी, तसेच प्रश्नपत्रिका सीलबंद आहेत, याची खात्री पटावी म्हणून व्हिडीओ अपलोड करण्याचे बंधन असणार आहे. उत्तरपत्रिकेची पाने फाडू नयेत. ओळख पटविण्यासाठी उत्तरपत्रिकेवर काहीही लिहू नये, अशाप्रकारे विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन करण्यात आले आहे.

परीक्षेदरम्यान यंदा कोणत्या सवलती कमी करण्यात आल्या?

-कोव्हिड प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षांच्या परीक्षांदरम्यान देण्यात आलेल्या सवलती यंदा मिळणार नाहीत. परीक्षा पूर्ण अभ्यासक्रमावर घेतल्या जाणार आहेत. तसेच पेपरसाठी देण्यात आलेला अतिरिक्त वेळ यंदा मिळणार नसून, परीक्षा तीन तासांमध्येच होणार आहे. त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिका व्हायरल होण्याचा धोका टाळण्यासााठी यंदा परीक्षेपूर्वी दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका मिळणार नाहीत, तर त्या वेळेवर दिल्या जाणार आहेत.

भरारी पथके व सुरक्षेबाबत कशी व्यवस्था असेल?

-सुरक्षा व्यवस्था हा गैरप्रकार टाळण्याच्या उद्दिष्टातील मुख्य टप्पा असल्यामुळे जुलै महिन्यातच याबाबत प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीचेही आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर असणार आहे. जिल्हा स्तरावर चार भरारी पथके, तर मंडळाची दोन भरारी पथके असणार आहेत. रनरद्वारे परीक्षा केंद्रावरील व्हिडीओ मंडळामार्फत दिलेल्या लिंकवर वेळोवेळी अपलोड केला जाणार आहे.

SSC HSC Exam: दहावी, बारावी परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी ‘तो’ निर्णय रद्द

काही संघटनांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे, त्यावर पर्याय काय?

पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयावर राज्यस्तरावरून निश्चितपणे तोडगा काढला जाईल. आमच्याप्रमाणे शिक्षक, शिक्षकेतरांचे उद्दिष्टही विद्यार्थीहितच आहे. त्यामुळे नक्कीच लवकरात लवकर ही परिस्थिती बदलेल. सध्या तरी यावर दुसरा कोणताही पर्याय मंडळाने शोधलेला नाही.

विद्यार्थी समुपदेशनाबाबत काही उपाययोजना आहेत का?

विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी मंडळाने समुपदेशक नियुक्त केले असून, त्यांची यादी शाळांकडे देण्यात आली होती. वर्षभर विद्यार्थ्यांना येणाऱ्या ताण-तणावाच्या समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांना संपर्क करण्याची मुभा आहे. त्याचप्रमाणे मुख्याध्यापक व वर्गशिक्षकांनी दर १५ दिवसांनी वर्गात जाऊन या विद्यार्थ्यांशी संवादाद्वारे समुपदेशन करण्याचा उपक्रमही यंदा राबविण्यात आला.

HSC Exam: बारावी प्रात्यक्षिक परीक्षांना शिक्षक आंदोलनाचा फटका
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; परीक्षेसाठी बोर्डाने जारी केले नवे नियम

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.