Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
SSC HSC Exam: दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांच्या प्रत्येक शंकेचे होणार निरसण, ‘या’ क्रमांकांवर साधा संपर्क
दहावी, बारावी परीक्षा विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात द्यावी, विद्यार्थ्यांना अभ्यास व परीक्षा विषयी मार्गदर्शन मिळावे, परीक्षेबाबत शंकांचे निरसण करण्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सपुदेशक नियुक्त केले आहेत.
शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी तर, दहावीची परीक्षा २ मार्चपासून सुरु होत आहे. परीक्षेच्या अनुषंगाने शिक्षण मंडळाने विभागात समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. बारावीच्या परीक्षेसाठी १ लाख ६८ हजार २६३ व दहावीच्या परीक्षेसाठी १लाख ८० हजार २१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना अभ्यास व परीक्षेविषयी समस्या निर्माण झाल्यास त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, तसेच तणावमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना परीक्षा देता यावी, यासाठी समुपदेशक नियुक्त केल्याचे मंडळाने म्हटले आहे.
परीक्षांचा व अभ्यासाचा ताण येवू नये, परीक्षेत नापास होऊ अशी भीती इत्यादी कारणामुळे विद्यार्थी दडपणाखाली राहतात. हे टाळण्यासाठी विद्यार्थी, पालक व संबंधित घटकांना येणाऱ्या सर्व शंकाचे निरसन करण्यासाठी, आवश्यक मार्गदर्शनासाठी समुपदेशक नियुक्त करण्यात आल्याचे मंडळाने म्हटले आहे. विभागातील पाच ही जिल्ह्यात प्रत्येकी दोन समुपदेशक नियुक्त करण्यात आले आहेत.
परीक्षा देत असलेले विद्यार्थी व पालकांना परीक्षेबाबत काही समस्या असल्यास त्यांनी समुपदेकांशी संपर्क करावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
जिल्हा समुपदेशक
औरंगाबाद बाळासाहेब चोपडे (९२८४८४७५८२)
शशीमोहन सिरसाट (९४२२७१५५४६)
बीड एस. पी. मुटकुळे (९६८९६४०५००)
चेतन सौंदळे (९४२२९३०५९९)
जालना एस. टी. पवार (९४०५९१३८००)
सूर्यकांत खांडेभरड (९४०४६०६४७९)
परभणी पी. एम. सोनवणे (९४२२१७८१०१)
आमिर खान (९८६०४४४४९८६)
हिंगोली एस. जी. खिल्लारे (९०११५९४९४४)
डी. आर. चव्हाण (९८२२७०६१०२)