
Tej Police Times
प्रभू रामचंद्र,सीता आणि लक्ष्मण यांनी चौदा वर्षाचा वनवास भोगला. ही चौदा वर्ष रामाने कुठं घालविली याचा इतिहास रामायण या ग्रंथात आढळतो. असे असले तरी प्रभू रामचंद्र यांच्या वनवासातील वास्तव्या बाबत अनेक दंतकथा आढळून येतात. अशीच एक दंथकथा चंद्रपूर जिल्हातील कोठारी या परिसरात प्रचलित आहे. नेमकी काय आहे ही दंथकथा जाणून घेऊया.
दक्षिणा पताला लागून असलेला भाग म्हणजे चंद्रपूर जिल्हा. प्राचीन काळी वर्धा, वैनगंगा नदीचे पात्र दक्षिणापथाकडे जाण्यासाठी प्रमुख मार्ग होते. त्यामुळे या दोन्ही नदी पात्रालगत अनेक प्राचीन वस्तीचे पुरावे इतिहासकारांना आढळले आहेत. मात्र प्रभू रामचंद्र यांनी या भागात वास्तव्य केल्याचे ऐतिहासिक पुरावे अद्याप आढळले नाहीत.
चंद्रपूर -अहीरी मार्गावर असलेल्या कोठारी इथून चार की. मी. अंतरावर असलेल्या कठोली-कुडेसावली परिसरात असलेल्या वर्धा नदी पात्रालगत शैलगृह आहे. या शैलगृहाला रामतीर्थ म्हणून ओळखल्या जाते. दगडात कोरलेल्या या गुफेत प्रभू रामचंद्र, सीता आणि लक्ष्मण वनवासात असताना या ठिकाणी काही काळ वास्तव्य केल्याची दंथाकथा प्रचलित आहे. या ठिकाणी ऐकून तीन गुफा होत्या मात्र वारंवार येणाऱ्या पुराने दगडाची झीज होऊन दोन गुफा नदी पात्रात गडप झाल्या, असे वृद्ध नागरिक सांगतात. रामनवमीच्या दिवशी मोठ्या संख्येने येथे भाविक दर्शनासाठी येत असतात. गावातील नागरिकांनी इथे काही नवीन मंदिरांची निर्मिती केली आहे.
ही गुफा सर्वप्रथम चंद्रपूरचे इतिहास अभ्यासक अशोक सिंह ठाकुर यांनी शोधली आहे. ही गुफा सातवाहन कालीन असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. बौद्ध भिक्षू, हिंदू संन्यासी यांनी ध्यान साधणेसाठी या गुफेचा वापर केला होता.
Recover your password.
A password will be e-mailed to you.