तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

वनवासात असताना प्रभू रामचंद्राने इथं केला होता मुक्काम?

0 91

चंद्रपूरला पाचशे वर्षांचा इतिहास आहे. त्याची साक्ष पटवून देणाऱ्या अनेक पौराणिक वास्तू येथे आहेत. पौराणिक कथेनुसार, माता कैकयीच्या आग्रहावरून भगवान रामांना १४ वर्षांसाठी वनवासात पाठवण्यात आले. तेव्हा भगवान राम, त्यांची पत्नी सीता आणि त्यांचा भाऊ लक्ष्मण यांनी वास्तव्यासंबंधी काही दंतकथा सांगितल्या जातात. अशीच एक दंथकथा चंद्रपूर जिल्हातील कोठारी या परिसरात प्रचलित आहे. नेमकी काय आहे ही दंथकथा?

चंद्रपूर

प्रभू रामचंद्र,सीता आणि लक्ष्मण यांनी चौदा वर्षाचा वनवास भोगला. ही चौदा वर्ष रामाने कुठं घालविली याचा इतिहास रामायण या ग्रंथात आढळतो. असे असले तरी प्रभू रामचंद्र यांच्या वनवासातील वास्तव्या बाबत अनेक दंतकथा आढळून येतात. अशीच एक दंथकथा चंद्रपूर जिल्हातील कोठारी या परिसरात प्रचलित आहे. नेमकी काय आहे ही दंथकथा जाणून घेऊया.

खरंच प्रभू रामचंद्रांनी इथं वास्तव केलं काय?

खरंच प्रभू रामचंद्रांनी इथं वास्तव केलं काय?

दक्षिणा पताला लागून असलेला भाग म्हणजे चंद्रपूर जिल्हा. प्राचीन काळी वर्धा, वैनगंगा नदीचे पात्र दक्षिणापथाकडे जाण्यासाठी प्रमुख मार्ग होते. त्यामुळे या दोन्ही नदी पात्रालगत अनेक प्राचीन वस्तीचे पुरावे इतिहासकारांना आढळले आहेत. मात्र प्रभू रामचंद्र यांनी या भागात वास्तव्य केल्याचे ऐतिहासिक पुरावे अद्याप आढळले नाहीत.

वर्धा नदीच्या काठावर आहे रामतीर्थ…

वर्धा नदीच्या काठावर आहे रामतीर्थ...

चंद्रपूर -अहीरी मार्गावर असलेल्या कोठारी इथून चार की. मी. अंतरावर असलेल्या कठोली-कुडेसावली परिसरात असलेल्या वर्धा नदी पात्रालगत शैलगृह आहे. या शैलगृहाला रामतीर्थ म्हणून ओळखल्या जाते. दगडात कोरलेल्या या गुफेत प्रभू रामचंद्र, सीता आणि लक्ष्मण वनवासात असताना या ठिकाणी काही काळ वास्तव्य केल्याची दंथाकथा प्रचलित आहे. या ठिकाणी ऐकून तीन गुफा होत्या मात्र वारंवार येणाऱ्या पुराने दगडाची झीज होऊन दोन गुफा नदी पात्रात गडप झाल्या, असे वृद्ध नागरिक सांगतात. रामनवमीच्या दिवशी मोठ्या संख्येने येथे भाविक दर्शनासाठी येत असतात. गावातील नागरिकांनी इथे काही नवीन मंदिरांची निर्मिती केली आहे.

​गुफा सातवाहन कालीन

​गुफा सातवाहन कालीन

ही गुफा सर्वप्रथम चंद्रपूरचे इतिहास अभ्यासक अशोक सिंह ठाकुर यांनी शोधली आहे. ही गुफा सातवाहन कालीन असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. बौद्ध भिक्षू, हिंदू संन्यासी यांनी ध्यान साधणेसाठी या गुफेचा वापर केला होता.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.