Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एप्रिल महिन्यातले सण उत्सव, जाणून घेऊया कामदा एकादशी ते अक्षय्य तृतीया तिथी आणि महत्व

13

भारतीय सौर राष्ट्रीय पंचांगाप्रमाणे मराठी नववर्षाला आरंभ झाला आहे. शालिवाहन शके १९४५ सुरू झाले असून, यंदाचे संवत्सरनाम शोभन आहे. मार्च महिन्यात होळी, गुढीपाडवा यांसारखे मोठे सण साजरे करण्यात आले. हिंदू नववर्षाला सुरुवात झाली असून, एप्रिल महिन्यातही अनेक महत्त्वाचे सण साजरे केले जाणार आहेत. गुरुचा अस्त झाल्याने या महिन्यात विवाह मुहूर्त नसले तरी एकादशी, हनुमान जयंती, गुड फ्रायडे, अक्षय्य तृतीया सारखे महत्वाचे सण आहेत. जाणून घेऊया सणाची तारीख आणि महत्व.

कामदा एकादशी

चैत्र शुद्ध एकादशीला कामदा एकादशी साजरी केली जाते. १ एप्रिल रोजी येणाऱ्या कामदा एकादशीला भगवान नारायण यांचे पूजन केले जाते. प्राचीन काळात राजा दिलीप यांना गुरु वशिष्ठ यांनी या व्रताचे महत्त्व सांगितले होते. भगवान नारायण यांच्या उपासनेमुळे सर्व पापांपासून मुक्ती मिळते. अशी मान्यता आहे. भगवान नारायण यांचे कामदा एकादशीचे व्रत केल्यामुळे ब्रह्महत्यासारख्या महाभयंकर पापातूनही मुक्ती मिळू शकते, असे सांगितले जाते.

महावीर जयंती

महावीर जयंती

चैत्र शुद्ध त्रयोदशीला महावीर जयंती साजरी केली जाते. सोमवार 3 एप्रिल रोजी हा सण आहे. तसेच या दिवशी अनंग त्रयोदशी असून, अनंग व्रत केले जाते. संस्कृत साहित्यात कामदेवाला अनंग म्हटले आहे. समाधी भंग केल्यामुळे महादेव शिवशंकराने कामदेवाला भस्म केले. यानंतर कोणत्याही अंगाशिवाय त्यांनी सर्व प्राण्यांमध्ये प्रवेश केला, असे म्हटले जाते. म्हणून चैत्र शुद्ध त्रयोदशीला अनंग त्रयोदशी म्हटले जाते आणि या दिवशी अनंग व्रत केले जाते. यादिवशी सोमप्रदोष व्रत देखील आहे.

हनुमान जयंती

हनुमान जयंती

चैत्र पौर्णिमेला रामभक्त हनुमान यांचा जन्म झाला होता. एप्रिल महिन्यात गुरुवार ६ एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. बुद्धिमतांवरिष्ठम्, मनाच्या वेगाने कुठेही पोहोचू शकणारे, परम रामभक्त आणि चिरंजीव अशा हनुमंतांची जयंती संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. बळ आणि बुद्धिचा अनोखा संगम हनुमंतांच्या ठायी पाहायला मिळतो. चैत्र पौर्णिमेला वैशाख स्नानारंभ होत असून, छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे.

​गुड फ्रायडे

​गुड फ्रायडे

ख्रिश्चन धर्मियांमध्ये गुड फ्रायडेला महत्त्व आहे. गुड फ्रायडेला होली फ्रायडे, ब्लॅक फ्रायडे किंवा ग्रेट फ्रायडे, असेही म्हटले जाते. येशू ख्रिस्ताला या दिवशी क्रॉसवर चढवले गेले होते. ७ एप्रिल रोजी गुड फ्रायडे आहे. गुड फ्रायडे सप्ताहाच्या स्वरुपात साजरा केला जातो. यानंतर ईस्टर संडे साजरा केला जातो. याच दिवशी कोल्हापूर येथील महालक्ष्मी रथोत्सव आणि जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात येईल.

संकष्ट चतुर्थी आणि ईस्टर डे

संकष्ट चतुर्थी आणि ईस्टर डे

रविवार, ९ एप्रिल रोजी संकष्ट चतुर्थी आहे. गणेश भक्त या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करून गणपतीचे नामस्मरण करून संकष्ट चतुर्थी व्रत करतात. गणपती उपासकांसाठी संकष्ट चतुर्थीला महत्त्व असते. चंद्रोदयानंतर उपवास सोडला जातो. तसेच या दिवशी ईस्टर डे साजरा केला जाईल. ‘ईस्टर डे’ या दिवसाला ‘येशू ख्रिस्ताचा पुनरुत्थान दिन’ असेही म्हटले जाते. याच दिवशी दोन हजार वर्षांपूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताने मृत्यूवर विजय मिळवल्याचे मानले जाते.

​डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

​डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

शुक्रवार, १४ एप्रिल रोजी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. हा दिवस समानता दिवस आणि ज्ञान दिवस म्हणूनही साजरा केला जातो. महान मानवाधिकार आंदोलक, भारतीय संविधान निर्माण करण्यात सिंहाचा वाटा असणारे, दलितांना हक्क मिळवून देणारे आणि प्रकांड पंडित बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रथम पुण्यात साजरी करण्यात आली. तेव्हापासून आंबेडकर जयंती साजरी करण्याची परंपरा सुरू झाली.

वरुथिनी एकादशी

वरुथिनी एकादशी

रविवार, १६ एप्रिल रोजी येणाऱ्या चैत्र कृष्ण एकादशीला वरुथिनी एकादशीच्या नावाने ओळखले जाते. एकादशीला उपवास करण्याची दीर्घ परंपरा आहे. या एकादशीला केलेले व्रत मोक्षदायक मानले जाते. यमराज आणि यमलोकाच्या भयापासून मुक्त होण्यासाठी वरुथिनी एकादशीचे व्रत आवश्यक असल्याचे श्रीकृष्णाने सांगितले होते. या दिवशी श्रीविष्णूंच्या वराह अवताराचे पूजन केले जाते.

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी

भगवान श्री दत्तात्रेय यांचे तिसरे पूर्णावतार म्हणून अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची ओळख आहे. पौराणिक आधारानुसार, स्वामींनी चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील ‘वटवृक्ष समाधी मठ स्थानी’ माध्याह्न समयी आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली. यंदा ही तिथी १८ एप्रिल रोजी आहे. याच दिवशी मासिक शिवरात्री आहे.

रमजान ईद

रमजान ईद

शनिवार, २२ एप्रिल २०२२ रोजी इस्लामिक पंचांगानुसार रमजान ईद साजरी केली जाणार आहे. मार्च महिन्यात सुरू झालेला रमजान महिना या दिवशी संपतो. रमजान ईद ही मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची असते. या दिवशी मुस्लिम बांधवांचा रोजा संपतो.

अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया

एखद्या नवीन कामाची सुरुवात अक्षय्य तृतीयेपासून केली जाते. कारण या तिथीला सुरू झालेले काम किंवा केलेले काम अक्षय्य राहते, अशी मान्यता आहे. अक्षय्य म्हणजे कधीही क्षय न होणारे म्हणजेच कधीही न संपणारे होय. यंदा शनिवार २२ एप्रिल २०२३ रोजी साजरा केला जाईल.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.