
Tej Police Times
राज्य सरकारच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा परीक्षा संपल्यानंतर एप्रिल, मे महिन्यात सुट्टीसाठी बंद असतात. गेल्या काही वर्षांपासून मार्च, एप्रिल महिन्यात उष्णतेची तीव्रता वाढत आहे. बहुतांश शहरांमध्ये ४० अंशाच्या वर तापमान आहे. ठाण्यात एप्रिल महिन्यात ४३.३ अंश तापमानाची नोंद झाली आहे. सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळा एप्रिल महिना संपेपर्यंत चालू असतात. काही शाळांमध्ये पंखेदेखील नादुरुस्त असतात.
लहान मुले पाणी पिण्यास टाळाटाळ करतात त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे गत वर्षाच्या तापमानाचा अंदाज घेऊन शाळांचे वेळापत्रक बनविण्याचे आदेश द्यावेत. तसेच फी केंद्रस्थानी न ठेवता विद्यार्थी केंद्रस्थानी ठेऊन सीबीएसई, आयसीएसई शाळाचे वेळापत्रक राज्य शासनाच्या शाळांच्या वेळापत्रप्रमाणे करण्याची मागणी मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.