
Tej Police Times
मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी वाढते तापमान लक्षात घेता शाळांना सुट्टी जाहीर करण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत होती. त्यानुसार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यासंदर्भात घोषणा करीत २१ एप्रिलपासून राज्य शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. मात्र इतर राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांबाबत कोणताही निर्णय जाहीर न केल्याने या पालक आणि शाळा प्रशासनांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
सध्या मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी इतर शिक्षण मंडळांच्या शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. त्यामुळे लगेचच शाळा बंद केल्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे आता शाळा प्रशासनाने ऑनलाइन वर्ग सुरू करण्याची तयारी केली आहे.
‘मुंबईत सध्या तापमान खूप वाढले आहेत. त्यामुळे मुलांना त्याचा त्रास होत आहे. परिणामी अनेक पालकांनी सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने आम्ही सुट्टीऐवजी ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचे ठरवले आहे. प्राथमिक आणि माध्यमिक दोन्हीसाठी ऑनलाइन वर्ग घेतले जातील,’ असे पश्चिम उपनगरातील एका नामांकित शाळाच्या मुख्याध्यापकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
Recover your password.
A password will be e-mailed to you.