
Tej Police Times
मोबाईल फोन आणि त्यांचे टॉवर रेडिओ लहरी निर्माण करतात. अनेक अभ्यासातून समोर आलं आहे की, जरी कमी फ्रिक्वेन्सी रेडिओ लहरी मानवांसाठी हानिकारक नसल्या तरी त्यांच्या जास्त संपर्कामुळे शरीरात ट्यूमर होऊ शकतात. तसंच स्मार्टफोनमुळे आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात. ते किशोरवयीन मुलांमध्ये चिंता आणि मानसिक तणाव वाढवत असल्याचं आढळलं आहे. काही अहवालांनुसार, मोबाईल रेडिएशनमुळे शिकण्यात अक्षमता आणि लहान मुलांमध्ये IQ कमी होऊ शकतो.
वाचाः ChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधान
लहान मुलंही अनेकदा रात्री उशिरापर्यंत चित्रपट पाहण्यात किंवा त्यांच्या फोनवर गेम खेळण्यात व्यस्त असतात. प्रौढ व्यक्तीही बराच वेळ मोबाईलमध्ये बिजी असतात. दरम्यान मोबाईलच्या स्क्रीनशी होणाऱ्या दीर्घ संपर्कामुळे डोळ्यांना हानी पोहोचू शकते. या सर्वाचा आपल्या स्लिपिंग सायकलवरही परिणाम करते ज्यामुळे थकवा आणि झोप येते.
वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा
मोबाईल फोनचा जास्त वापर केल्याने आपला एकमेंकाशी होणार संवाद देखील कमी होत आहे. स्मार्टफोन्सने समोरासमोर होणारा संवाद आता संपत चालला आहे. कौटुंबिक कार्यक्रमादरम्यान किंवा रात्रीचे जेवण एकत्र करत असताना प्रत्येकजण आपआपल्या फोनला चिकटून असतो. मित्रांसोबतची पार्टी आता फक्त फोनमध्ये मग्न असलेल्या लोकांच्या समूहात बदलली आहे. या सर्वांमुळे एकमेंकाशी आपला संवाद कमी होत आहे.
वाचा : जबरदस्त कॅमेरा, 80W फास्ट चार्जिंग! One Plus 10 Pro फोनवर धमाकेदार डिस्काउंट, १७ हजार वाचवण्याची संधी
मोबाईल फोनमध्ये आजकाल दिवसभर सर्वचजण व्यस्त असतात. मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे आपल्या आउटडोअर अॅक्टिव्हिटी देखील कमी होत आहेत. मुले आता क्रिकेट किंवा इतर कोणताही खेळ खेळायला बाहेर पडत नाहीत, त्याऐवजी ते घरीच फोनवर गेम खेळतात. व्यायामाच्या अभावामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.
वाचाः फास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?
बऱ्याचवेळा फोनमध्ये व्यस्त असल्याने लोकांमधील प्रोडक्टव्हीटी कमी होत आहे. अनेकांचे असे म्हणणे आहे की काम करत असताना बरेचदा, आमचे लक्ष जवळजवळ नेहमीच आमच्या फोनकडे वळले जाते. आमची असाइनमेंट पूर्ण करण्याऐवजी आमचा मेसेज तपासण्याकडे जास्त कल असतो. मोबाईल फोनमध्ये जास्त व्यस्त राहिल्याने उत्पादनक्षमतेवर म्हणजेच प्रोडक्टविटीवर विपरित परिणाम होतो.
वाचा : घर होईल थिएटरसारखं! 55 इंचांचे ‘हे’ लेटेस्ट स्मार्ट टीव्ही आहेत एकदम बेस्ट, पाहा यादी
वाहन चालवताना किंवा रस्ता ओलांडताना मोबाईल फोन वापरण्यापासून चेतावणी देणारी चिन्हे आपण अनेकदा पाहतो. परंतु त्यांच्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. रस्त्यावरून जाताना लोक अजूनही फोन वापरतात. त्यामुळे लक्ष वळवल्याने अनेकदा जीवघेणे रस्ते अपघात होतात. फोनमुळे रस्ते अपघातांचे प्रमाणे मागील काही वर्षात बरेच वाढले आहे. दरम्यान फोन हा रस्ते अपघातात एक महत्त्वाचा घटक बनला आहे.
वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन
आजकाल पालक आपल्या मुलांना देखील मनोरंजनासाठी मोबाईल फोन देतात. परंतु सोशल मीडियाच्या व्यसनामुळे मुलं तसंच मोठे व्यक्ती त्यांची वैयक्तिक माहिती संपूर्ण जगासाठी बाहेर पोस्ट करतात. ही माहिती इंटरनेटवर काही वाईट व्यक्ती लोकांना धमकावण्यासाठी आणि गैरवापर करण्यासाठी वापरतात. ज्यामुळे सायबर गुन्हे ही गंभीर समस्या बनत चालली आहे. त्यामुळे फोनमुळे सुरक्षाही धोक्यात येऊ लागली आहे.
वाचा : कुठंही जायची गरज नाही, घरात बसून ठीक करू शकता आयफोनची बॅटरी, पाहा टिप्स
जुने मॉडेल जुने होत चालले आहेत त्यापेक्षा अधिक वेगाने कंपन्या नवीन फोन बाजारात आणत आहेत. नवनवीन येणारे फोन्स लोकांना त्यांचे जुने फोन नवीन फोनसोबत एक्सचेंज करण्यास प्रवृत्त करतात. याचा परिणाम ई-कचऱ्याच्या निर्मितीमध्ये होतो, ज्यामुळे पारा आणि कॅडमियम सारखे विषारी जड धातू माती आणि भूगर्भातील पाण्यात मिसळण्याची शक्यता असते. ज्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. दरम्यान त्यामुळे वाढत्या स्मार्टफोनमुळे ईवेस्टही वाढत आहे.
वाचा : Battery Saver : फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो
आजकाल ओरिजनल मध मिळणं कठीण झालं आहे. कारण मोबाईल फोन आणि त्यांच्या टॉवर्सच्या रेडिएशनमुळे मधमाश्यांच्या संख्येवर परिणाम होत असल्याचे आढळून आले आहे. जगभरातील मधमाशांच्या संख्येत घट नोंदवली गेली आहे. कमी होणाऱ्या मधमाशांमुळे मधही कमी होत आहे. तसंच मोनार्क फुलपाखरे आणि उडणाऱ्या मुंग्यांसारख्या इतर कीटकांनाही मोबाईल रेडिएशनचा फटका बसला आहे.
वाचा : Gaming Laptops : आता गेम खेळणं होईल अगदी खरंखुरं! ‘हे’ टॉप ५ गेमिंग लॅपटॉप आहेत बेस्ट
मोबाईल टॉवरचा वनस्पतींच्या जीवनावर परिणाम होतो
मोबाईल टॉवरमुळे फळे देणार्या वनस्पतींच्या उत्पादनावरही परिणाम होतो. तसंच मोबाईल टॉवर्सचा पक्ष्यांवरही परिणाम होतो. पर्यावरण आणि वन मंत्रालयाने नुकत्याच केलेल्या एका अभ्यासातून असा निष्कर्ष काढला आहे की मोबाईल टॉवरमधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन (EMR) पक्ष्यांच्या उडण्याच्या पद्धतींवर परिणाम करतात. EMR लहरी स्थलांतरित पक्ष्यांना मानसिक, शारिरीक अडचणी आणतात.
वाचा : आता तुमचं प्रायव्हेट चॅट राहिल एकदम ‘प्रायव्हेट’, असं लॉक करा WhatsApp
Recover your password.
A password will be e-mailed to you.