
Tej Police Times
या वराचा मान राखत भगवान विष्णूंनी नर-सिंह म्हणजेच शरीर मनुष्याचे व मुख सिंहाचे असे रूप धारण केले. हिरण्यकशिपूला नृसिंहाने न दिवसा, न रात्री तर संध्याकाळी (सूर्यास्ताच्या वेळी);. न घरात न बाहेर, तर घराच्या दरवाज्यात उंबऱ्यावर मृत्यू दिला. ना शस्त्र ना अस्त्र, तर आपल्या नखांनी नरसिंहांनी हिरण्यकशिपूचे पोट फाडले. भूमीवर नाही आणि आकाशातही नाही, तर आपल्या मांडीवर झोपवून हिरण्यकशिपूचा वध केला. असे हे नरसिंहांनी ब्रह्मदेवांचे वचन सत्य केले आणि जनकल्याणासाठी एका क्रूर दैत्याचा अंतही केला.
कितीही मोठा वर मागितला असला, तरी अहंकार, मद आणि अनन्वित अत्याचार यांमुळे मृत्यू निश्चित होतो, हे या कथेवरून आपल्याला समजते. प्रामाणिकपणा, सच्चेपणा, निस्सीम भक्ती, उपासना याचे महत्त्वही या कथेवरून आपणास मिळते. ब्रह्मदेवांनी दिलेला वर हा अमरत्वाच्या जवळ जाणारा होता. मात्र, हिरण्यकश्यपूने आपल्या वर्तनातून मृत्यूचे सत्य स्वीकारले नाही. माणसाने जन्म घेतला म्हणजे त्याचा मृत्यू अटळ असतोच.
Recover your password.
A password will be e-mailed to you.