
Tej Police Times
दरम्यान, राज्यातील सरकारी, खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांची आधारसह माहिती गेल्यावर्षी ३० नोव्हेंबरपर्यंत सरल प्रणालीवर भरण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. मात्र, अनेक विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड उपलब्ध नाही. काहींच्या आधारकार्डातील माहिती विसंगती, तर काहींना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी शिक्षण विभागाने ३० एप्रिलला संच मान्यता अंतिम करण्याचे निश्चित केले होते.
मात्र ही मुदत उलटून गेल्यानंतरही आधार जोडणीचे काम पूर्ण न झाल्याने अंतिम संच मान्यता १५ मेपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. आता ज्या शाळांतील सर्व विद्यार्थ्यांच्या आधार जोडणीचे काम झाले आहे, त्या शाळांना संच मान्यता देण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाने सुरू केली आहे. मात्र, पालिकेच्या शाळा अद्यापही मागे असल्याने त्यांना शिक्षकांची पदे कमी मंजूर होण्याची शक्यता आहे. त्यातून पालिकेच्या शाळेतील शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.