Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नाना पटोलेंचा भाजपवर पुन्हा घणाघात; तालिबानच्या मुद्द्यावरही केलं भाष्य

13

हायलाइट्स:

  • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा पुन्हा भाजपवर हल्लाबोल
  • केंद्र सरकार सोशल मीडिया आणि माध्यमांना दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप
  • तालिबानच्या मुद्द्यावर काय म्हणाले नाना पटोले?

औरंगाबाद:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole) यांनी औरंगाबादमध्ये केंद्र सरकार आणि भाजपवर घणाघाती टीका केली. ‘सोशल मीडिया आणि माध्यमांना दाबण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. केंद्र सरकारचा संवैधानिक व्यवस्थेवर विश्वास नाही, त्या मोडीत काढण्यावर त्यांचा भर आहे. धर्म प्रथम मानणाऱ्या देशाचे तालिबान होते, भारतात आशा प्रकारचे तालिबान होणार नाही यासाठी काँगेसचा लढा कायम राहील,’ असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

‘स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतरही काँग्रेस पक्षाने देशाच्या ज़डणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे. स्वातंत्र्यानंतर भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी काँग्रेसच्या सरकारने नियोजनपूर्वक आखणी करुन विकासकामे राबवली, त्यातूनच पायाभूत सुविधा निर्माण झाल्या, शिक्षण, रस्ते, पाण्याची व्यवस्था, आरोग्य व्यवस्था उभी राहिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने आणि काँग्रेस विचाराने देशातील एकात्मता कायम ठेवली गेली. परंतु मागील ७ वर्षापासून ही सर्व व्यवस्थाच मोडीत काढण्याचे काम केले जात आहे. काँग्रेस पक्षासाठी संविधान व देशाची एकात्मता सर्वोच्च असून ती अबाधित ठेवण्यासाठी संघर्ष करत आहोत,’ असं नाना पटोले म्हणाले.

pawar gives answer to raj thackeray: ‘जातीयवादा’च्या आरोपानंतर शरद पवार यांचा राज ठाकरेंना टोला; म्हणाले…

‘तेच लोक धर्माच्या नावावर देश तोडण्याची भाषा करत आहेत’

‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘व्यर्थ न हो बलिदान’ अभियानाअंतर्गत नाना पटोले औरंगाबादमधील कार्यक्रमात बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ज्या लोकांचा देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभाग नव्हता तेच लोक धर्माच्या नावावर देश तोडण्याची भाषा करत आहेत. स्वातंत्र्यानंतर देशातील सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविदांने नांदत असताना धर्माच्या नावावर राजकारण करुन तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे,’ असा गंभीर आरोप पटोले यांनी भाजपवर केला आहे.

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊनची शक्यता आहे का? राष्ट्रवादीच्या मंत्र्याने दिलं थेट उत्तर

‘१४ ऑगस्ट हा दिवस स्मृती दिवस म्हणून साजरा करण्याचा भाजपाचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला. ज्या दिवशी देशात रक्तपात झाला त्या दिवसाच्या स्मृती कशाला जागृत करता? देशात मागील ७ वर्षांपासून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे. सरकारच्या विरोधात लिहिणाऱ्या-बोलणाऱ्यावर कारवाई केली जाते. शेतकरी ९ महिन्यांपासून आंदोलन करत आहेत, त्याची साधी दखलही पंतप्रधान घेत नाहीत. बेरोजगारी, महागाईचा प्रश्न गंभीर असून देशातील परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तरुणांनीच आवाज बनून उभे ठाकले पाहिजे,’ असं आवाहन नाना पटोले यांनी केलं आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.