
Tej Police Times
पालकमंत्री देसाई यांनी हे विदयापीठ औरंगाबादलाच राहिल, असे आश्वासन दिले होते. मात्र तरीही क्रीडा विदयापीठ पुण्याला नेण्यात आले. त्यामुळे विरोधात इम्तियाज जलिल यांच्या नेतत्वाखाली कोरोनाचे निर्बंध असतानाही रविवारी (१५ जुलै) आंदोलन करण्यात आले. या विरोधात सहाय्यक पोलिस निरिक्षक सय्यद मोहसीन अली यांच्या तक्रारीवरुन इम्तियाज जलील यांच्यासह माजी नगरसेवक नासेर सिद्दीकी, शहराध्यक्ष अब्दुल समीर, आरेफ हुसैनी, शारेक नक्षबंदी, गंगाधर ढगे, अजीम खान, फेरोज खान, कुणाल खरात, अनिस खान, शेख बब्बु लिडर, सय्यद अजीम, जुबेर खान, अबरार पटेल, अबरार बागवान, अनिस लिडर, सिराज बागवान, शेख निजामोद्दीन, अब्दुल हसन हाश्मी, अजहर पठाण, शोएब खान, अजहर चाऊस, जलील पटेल, मतीन खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्लिक करा आणि वाचा- अशीही शक्कल! महिलेला गंडवण्यासाठी चोरट्याने घेतला हॉटेलच्या थाळीचा आधार
औरंगबादच्या नामांतरालाही केला विरोध
औरंगाबादचे खासदारइम्तियाज जलिल यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याच्या वक्तव्यावरून शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.औरंगाबाद या शहराचा विकास करणे गरजेचे आहे. विकासकामे करून हे शहर पंचतारांकित श्रेणीत आणा, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे. इथे लोकांना पिण्यासाठी पाणी नाही आणि नाव काय बदलता, असेही खासदार जलील यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा- ‘राऊत यांची कुठलीच पिढी कोकणात दिसणार नाही’; नीलेश राणे आक्रमक
क्लिक करा आणि वाचा- ‘जातीयवादा’च्या आरोपानंतर शरद पवार यांचा राज ठाकरेंना टोला; म्हणाले…
Recover your password.
A password will be e-mailed to you.