Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी मंत्र्यांनी ‘मेनू कार्ड’ बनवलंय, भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप

19

हायलाइट्स:

  • भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा खळबळजनक आरोप
  • अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी मंत्र्यांनी मेनू कार्ड बनवलंय – विखे पाटील
  • अधिवेशन आलं की सरकारचं करोनाचं संकट वाढतं – विखे पाटील

अहमदनगर: ‘राज्यात विविध संकटे असताना त्यातून जनतेला दिलासा देण्याऐवजी महाविकास आघाडीच्या सरकारला अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये जास्त रस आहे. या बदल्या करण्यासाठी मंत्र्यांनी ‘मेनू कार्ड’ तयार करून ठेवले आहे,’ अशी टीका माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

संगमनेर तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना विखे पाटील यांनी राज्यातील आघाडी सरकारवर टीका केली. विविध पातळ्यांवर हे सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला. अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये गैरप्रकार होत असल्याकडे लक्ष वेधत त्यांनी कोणात्याही एका खात्याचे नाव न घेता सर्वच विभागांच्या मंत्र्यांवर टीका केली.

वाचा:‘भाजपची जन आशीर्वाद यात्रा म्हणजे करोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण’

विखे पाटील म्हणाले, ‘मागील दोन वर्षांपासून राज्‍यातील जनता करोनाच्या संकटाला सामोरे जात आहे. जनतेच्‍या कुठल्‍याच प्रश्‍नावर सरकार चर्चा करायला तयार नाही. अधिवेशन आले की या सरकारचे करोनाचे संकट वाढते. आपली पोलखोल होईल म्‍हणून सरकार कुठल्‍याच मुद्यावर बोलायला तयार नाही. राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात स्‍वत:च्‍या निधीतून रुग्‍णवाहिका द्यायला हव्या होत्‍या. परंतु, पालकमंत्र्यांनी ग्रामपंचायतींना मिळालेल्‍या १५ व्‍या वित्‍त आयोगाचा निधी परत घेऊन रुग्‍णवाहिका दिल्या. केंद्र सरकारकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा राज्‍यातील मंत्री करतात पण त्यांनी जनतेला काय दिले? याचा विचार केला पाहिजे,’ असेही विखे पाटील म्हणाले.

आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना विखे पाटील म्हणाले, ‘राज्‍यातील मराठा, ओबीसी समाजाचे आरक्षण या सरकारने जाणीवपूर्वक घालविले. आता केंद्र सरकारने घटनेमध्‍ये बदल करून आरक्षण देण्‍याचे आधिकार पुन्‍हा राज्‍य सरकारला दिले आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्‍याची जबाबदारी ही महाविकास आघाडी सरकारवर आली आहे. वास्‍तविक आरक्षण गेल्‍याचे प्रायश्चित म्‍हणून राज्‍य सरकारने मराठा, ओबीसी समाजातील विद्यार्थ्‍यांचे या वर्षाचे शैक्षणिक शुल्क माफ करायला हवे होते. परंतु, यांच्‍यात निर्णयाची धमक नाही. या सरकारच्‍या काळात मोठ्या प्रमाणाम भ्रष्टाचार वाढला आहे. अशा काळातही अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मंत्र्यांना जास्त रस आहे. त्यासाठी प्रत्येक मंत्र्याने मेनू कार्ड तयार करून ठेवले आहे,’ असा आरोपही विखे पाटील यांनी केला.

वाचा: अनिल देशमुखांना ईडीकडून पाचव्यांदा समन्स; आज उपस्थित न राहिल्यास…

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.