Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आयआयटी आणि एनआयटी ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती का? येथे अभ्यास करण्याचे खरे कारण आणि फायदे जाणून घ्या

8

Top Colleges in India: योग्य शैक्षणिक संस्था निवडणे हा एक प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय असतो. चांगल्या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेल्यानंतर विद्यार्थ्यांचा भविष्यतील मार्ग अधिक सोपा होतो. तसेच भविष्यतील अडचणींवर मात करण्यासाठी अनेक गोष्टींचे ज्ञान याच संस्थांमधून मिळते. भारतातील शिक्षणाबद्दल सांगायचे झाल्यास, भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) आणि राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT) या दोनही संस्थांविषयी सांगण्यामध्ये प्रचंड लोकप्रियता पाहायला मिळते. त्यामुळे या संस्थांमधून शिक्षण घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. भविष्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याबरोबरच चांगला व्यक्ती घडवण्यातही अशा संस्थांचा मोलाचा वाटा असतो.

विद्यार्थ्यांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची पूर्ण संधी मिळते का?
आयआयटी आणि एनआयटीसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची, त्यांची कौशल्ये विकसित करण्याची पूर्ण संधी मिळते. येथे विद्यार्थ्यांना प्राध्यापक सर्वतोपरी मदत करतात. यामुळेच, येथील विद्यार्थी अभ्यासाबरोबरच संशोधताही सर्वोच्च स्थानी असतात.

इथून शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळण्याची शक्यता जास्त असते?
या संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी पैसे तर मोजावे लागतातच, पण आर्थिकदृष्ट्या वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या शिष्यवृत्तीही दिल्या जातात. येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणाचा खर्च त्यांच्या पालकांवर कधीच ओझे ठरत नाही. याव्यतिरिक्त, अशा महाविद्यालयांमध्ये अभ्यास केल्याने नोकरीच्या सुरक्षिततेचा मोठा फायदा होतो. त्यामुळे, अशा नामांकित संस्थांमध्ये शिक्षण घेण्याचा एक महत्त्वाचे ठरते.

प्राध्यापकांची उत्तम साथ :
आयआयटी आणि एनआयटीमधील प्राध्यापक त्या-त्या विषयांमधले तज्ज्ञ असतात. त्यामुळे, अशा संस्थांमध्ये शिक्षणाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच अनेक गोष्टींचे ज्ञान मिळते. इतर संस्थांच्या तुलनेत या संस्थांमधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक विषयातील ज्ञान इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत अधिक असते. शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची नोकरीची सुरक्षितताही इतर संस्थांच्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.