
Tej Police Times
ज्या व्यक्तीने महाराष्ट्रात आलेल्या महाविकास आघाडीच्यो सत्तेला सुरुंग लावत स्वतःच राज्य निर्माण केले ते म्हणजे भाजप नेते आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मी पुन्हा येईन म्हणत दिलेली ललकारी त्यांनी खरी केली. त्यांच्या हातून सत्ता गेली तेव्हा ‘पुन्हा’ येईन’ची थट्टा झाली खरी पण ऐकतील ते देवेंद्र कसले.
जबरदस्त राजकीय खेळी करत देवेंद्र फडणवीस पुन्हा आलेच. या हुशार नेत्याच्या बुद्धीमत्तेचे कायमच कौतुक होत आले आहे. राजकीय विश्वात देवेंद्र जसे ते धुरंधर ठरले तसेच त्यांचे शैक्षणिक प्रगती पुस्तकही सगळ्यांच्या वरचढ आहे.
देवेंद्र फडणवीस हे अत्यंत उच्चशिक्षित नेते आहेत. त्यांचा अर्थ विषयक अभ्यास सर्वच जाणून आहेत. शिवाय ते स्वतः कायद्याचे अभ्यासक (L.L.B and Legal Expert) आहेत. नागपूरच्या शासकीय विधी महाविद्यालयातून त्यांनी कायद्याची पदवी मिळवली आहे.
एवढेच नाहीतर त्यांनी बिझनेस मॅनेजमेंटमध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे. जर्मनीतील डीएसई बर्लिन या संस्थेत डिप्लोमा इन मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट मध्ये त्यांनी डिप्लोमा केला आहे. त्यामुळे राजकारणाप्रमाणेच शिक्षणातही फडणवीसांचा हात धरणे कठीणच..
महाराष्ट्राच्या राजकारणात कायम चर्चेत राहणारे आणि सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणजे बारामती मतदार संघाचे आमदार अजित पवार. आपल्या काकांच्या म्हणजेच राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात आलेले अजित पवार हे एकाच कार्यकाळात विविध पक्षांशी युती करुन तीन वेळा उपमुख्यमंत्री झालेले पहिले नेते आहेत.
मग ते पहाटेचा शपथविधी असो, महाविकास आघाडीचे तिहेरी सरकार असो किंवा आत्ताची महायुती.. प्रत्येक सरकारमध्ये अजित पवार यांनी अचूक नेम साधत आपले उपमुख्यमंत्रीपद अबाधित ठेवले आहे. आता तर ज्यांच्याकडून राजकरणाचे धडे घेतले अशा राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाच बगल देऊन अजित पवार बाहेर पडले आहेत.
एखाद्या बड्या राजकीय विश्लेषकाला देखील अंदाज बांधता येणार नाही असे राजकारण करणाऱ्या अजित पवार यांचे शिक्षण मात्र फारसे झालेले नाही. अजित पवार केवळ बारावी पास आहेत. त्यांचे पदवीपर्यंत शिक्षण होऊनही ते कधीही हे सांगत नाहीत.
यामागेही एक कारण आहे. अजित पवार गावाकडे एस.एस.सी. झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते मुंबईत आले पर्यंत त्यांची पदवी पूर्ण होऊ शकली नाही. ‘बी कॉम’च्या शेवटच्या वर्षाला असतानाच त्यांचे वडील वारले आणि अजित पवार गावी बारामतीत परतले. पुढे कुटुंबाची जबाबदारी अंगावर पडली आणि दादांचे पदवीची एक परीक्षा अपूर्णच राहिली. म्हणून ते बारावी पर्यंतच शिक्षण झाल्याचे नमूद करतात.
‘शिवसेना माझीच आणि मी शिवसेनेचा’ असं म्हणणारे दोन नेते म्हणजे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदी असताना शिवसेनेशी बंड करून एकनाथ शिंदे चाळीस आमदारांना घेऊन बाहेर पडले आणि त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. हे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कायम लक्षात राहणारे बंड ठरले.
सध्या एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. परंतु शैक्षणिक प्रगती पुस्तकात मात्र शिंदे काहीसे मागे पडलेले दिसतात. घराची जबाबदारी आणि तरुण वयात लागलेले समाजकारणाचे वेड यामुळे शिंदे यांचे शिक्षण अवघे अकरावीपर्यंतच झाले आहे.
परंतु शिकण्याची जिद्द मनात असल्याने एकनाथ शिंदे यांनी २०१४ मध्ये पुन्हा शिक्षणाला सुरुवात केली. आपले पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला. एवढेच नाही तर मराठी आणि राजकारण (Marathi and Politics) हे दोन विषय घेऊन ते ७७.२५ टक्के गुणांनी उत्तीर्ण देखील झाले.
पण एकनाथ शिंदे यांना शिक्षणाविषयी प्रचंड आस्था आहे. परिस्थितीमुळे स्वतःला शिक्षण घेता आले नाही म्हणून त्यांनी मुलगा श्रीकांत शिंदे यांना डॉक्टर केले. श्रीकांत एकनाथ शिंदे हे एमएस,ऑर्थो (MS, Ortho) असून सध्या ते कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.
तर.. ज्यांच्या शिवाय महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण होऊ शकत नाही. असे दोन बंधु म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे. शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना जुन्या शिवसैनिकांची मोठी सहानुभूती आणि पाठिंबा मिळाला आहे. तर नुकत्याच अजित पवार यांनी राष्ट्रवादी सोबत केलेल्या बंडानंतर उद्धव आणि राज यांनी महाराष्ट्रासाठी एकत्र यावे अशी मागणी होत आहे.
हे दोन्ही बंधू शिक्षणात नाही तर कलेमध्ये पारंगत आहेत. उद्धव ठाकरे एक उत्तम छायाचित्रकार आहेत तर राज ठाकरे व्यंगचित्रकार. विशेष म्हणजे दोघांनीही आपले कलेचे पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईतील सर. ज. जी. कला महाविद्यालयातून (Sir J. J. School of Art ) पूर्ण केले आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.