तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

मुंबईत आज वातावरण तापणार, नारळी पौर्णिमा साजरी करण्यावरून मनसेचं चॅलेंज

0 57

हायलाइट्स:

  • मुंबईत आज वातावरण तापणार
  • नारळी पौर्णिमा साजरी करण्यावरून मनसेचं चॅलेंज
  • काहीही केलं तरी नारळी पौर्णिमा साजरी करणारच


मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून साजरी होणारी नारळी पौर्णिमा आज मुंबईत वातावरण तापवू शकते. कारण पोलिसांनी मनसैनिकांना १४९ नोटीस बजावली आहे. तरीदेखील मनसेच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत हा कार्यक्रम पार पाडणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुंबईत आजच वातावरण तापलेले पाहायला मिळेल.

करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. अशात रविवारी लॉकडाऊन असतानादेखील दादरमध्ये नारळी पौर्णिमेचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नियमानुसार सध्या सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना जमण्यास बंदी आहे. पण तरीदेखील मनसेच्या कार्यकर्त्यांनी नारळी पौर्णिमा साजरी करणारच असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आणि मनसे असा सामना आज पाहायला मिळेल.
सुप्रिया सुळेंनीही बंधू रणजीतदादा पवार यांना बांधली राखी, व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या…
खरंतर, कोळी बांधवांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचं आहे. नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव समुद्राला नारळ, श्रीफळ अर्पण करतात आणि पूजा करतात. पण करोनाच्या नियमांमुळे आधीच लॉकडाऊन असताना मनसेमुळे मुंबईतील वातावरण तापण्याची शक्यता आहे.
बांबूच्या राख्या झाल्या ग्लोबल! करोनाकाळात लाखोंची उलाढाल, १ हजार ३३ महिला आत्मनिर्भर

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.