
Tej Police Times
केंद्र सरकारच्या टास्क फोर्सचे सदस्य सध्या यावर काहीही बोलण्यास तयार नाहीयेत. पण समोर आलेल्या माहितीनुसार, तिसरी लाट येणार नाही आणि जर आली तर त्याचा फारसा धोका नसेल असं सांगण्यात येत आहे.
ऑगस्टच्या अखेरीस करोनावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण
सेंट्रल करोना टास्क फोर्सचे काही वरिष्ठ सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, करोनाची नवीन प्रकरणे सतत कमी होत आहेत. ऑगस्टच्या अखेरीस महाराष्ट्र आणि केरळमध्ये करोनाची प्रकरणे खूप वेगाने खाली येतील. आज काही राज्ये वगळता, बहुतेक राज्यांमध्ये करोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या प्रचंड कमी झाली आहे. ऑगस्टच्या अखेरीस, भारतात करोनाची प्रकरणे दररोज २० हजारांपेक्षा कमी होतील. दरम्यान, लसीकरण ६५ कोटी लोकांपर्यंत केले गेले असते.
पाणी पुरीमध्ये लघवी मिसळताना लाईव्ह व्हिडिओ, विक्रेत्याचे कृत्य पाहून तुम्हालाही राग येईल
यामुळे, करोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या पूर्णपणे कमी होईल आणि करोना असला तरी रुग्णालयात दाखल होण्याची गरज तितकी राहणार नाही. परंतू पुढील तीन आठवड्यांनंतरच तिसऱ्या लाटेबद्दल खरा अंदाज बांधता येईल असंही सांगण्यात येत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ सौम्या यांनी एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगितली आहे. त्यांच्या मते, तिसरी लाट येईल की नाही हे अद्याप सांगता येणार नाही. म्हणून, तिसऱ्या लाटाच्या शक्यतेबद्दल निश्चितपणे काहीही सांगितले जाऊ शकत नाही. पण तिसरी लाट आली तरी ती दुसरी लाटेइतकी प्राणघातक ठरणार नाही, हे निश्चितपणे सांगता येईल.
मुंबईत आज वातावरण तापणार, नारळी पौर्णिमा साजरी करण्यावरून मनसेचं चॅलेंज
Recover your password.
A password will be e-mailed to you.