तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

महाराष्ट्राला हादरवणारी घटना! भानामतीच्या संशयातून कुटुंबासोबत भयानक कृत्य; भरचौकात हातपाय बांधले अन्….

0 57

हायलाइट्स:

  • चंद्रपूर जिल्ह्यात घडली धक्कादायक घटना
  • भानामती, जादूटोण्याच्या संशयातून गावकऱ्यांचा राग अनावर
  • सात जणांना अमानुष मारहाण केली

चंद्रपूरः महाराष्ट्राला हादरवणारी एक घटना चंद्रपुर तालुक्यात घडली आहे. अंधश्रद्धेला बळी पडत एका कुटुंबाला गावकऱ्यांनी अमानुष मारहाण केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती या तालुक्यातील तेलंगणा- महाराष्ट्र सीमेवरील वणी खुर्द गावात ही संतापजनक घटना घडली आहे. गावात भानामती करण असल्याचा आरोप करत गावातील चार महिला व तीन वृद्धांना खांबांना बांधून मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत सात जण गंभीर जखमी झाले आहेत. तर, पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

वाचाः निर्बंधाची हंडी फुटणार?; गोविंदा पथकांसोबत मुख्यमंत्र्याची बैठक

गावातील दोन- तीन महिलांच्या अंगात देवी आली होती. त्यावेळी या महिलांनी या कुटुंबातील पुरुष व महिलांनी गावावर भानामती केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर महिलांनी नावं घेतलेल्या सर्वांना गावकऱ्यांनी एका चौकात आणलं व खांबाना सर्वांचे हातपाय बांधत बेदम मारहाण केली. चार महिला आणि तीन वृद्धांना खांबांना बांधून मारहाण करण्यात आली आहे.

वाचाः ‘… नाहीतर जन आशीर्वादाच्या ‘जत्रा’ लोकांना गुंगीचा मंत्र देऊन पुढे जातील’

पोलीसांना या घटनेबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पिडीतांना गावकऱ्यांच्या तावडीतून सोडवले आहे. या पिडीत सात व्यक्तींपैकी पाच व्यक्तींना जिल्हा सामान्या रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे. या सर्व प्रकारांनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वाचाः सुनील केदार यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करा; काँग्रेस नेत्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.