
Tej Police Times
क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्र्याच्या ‘त्या’ झापडीचे काय?; राणेंच्या अटकेनंतर भाजपच्या माजी मंत्र्याचा सवाल
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव होता या विरोधकाचा आरोप विनायक राऊत यांनी फेटाळून लावला. राणे यांना अटक करण्यासाठी पोलिसांवर कोणाचाही दबाव नव्हता असे ते म्हणाले. पोलिस हे कायद्याचे रक्षणकर्ते आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी कायद्याचे रक्षण केलेले आहे. या अटकेमुळे राज्यातील वातावरण चिघळण्याची शक्यता नसल्याचे राऊत म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- ‘शिवसेनेचीच आहे राणेंची भाषा, महाविकास आघाडीच्या लोकांनी मारत बसा माशा’
करावे तसे भरावे असे सांगतानाच वातावरण चिघळण्याची सुरुवातच नारायण राणे यांनी केली. यामुळे त्यांना अटक करण्याची आवश्यकता होती. वातावरण चिघळलं तर ती जबाबदारी भाजपाची असेल, असे राऊत म्हणाले. राणेंच्या वक्तव्याचं समर्थन न करण्याबाबत मी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करीन असेही राऊत म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- राणेंच्या अटकेनंतर जन आशीर्वाद यात्रा स्थगित; कोकण, राज्यात आंदोलनाचा इशारा
Recover your password.
A password will be e-mailed to you.