
Tej Police Times
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी मुंबई विद्यापीठाच्या श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विविध क्षेत्रात बहुमूल्य योगदान लाभले आहे. बाळासाहेबांनी त्यांच्या ओजस्वी, निर्भिड वाणीने आणि वक्तृत्वाने अनेक सभा गाजविल्या आहेत. विविध विषयावर त्यांनी परखड भाष्य केले आहे. बाळासाहेबांनी जनसामान्यांतून नेतृत्व उभे केले आहे. अशा अनेक विविधांगी पैलूंचा सर्वंकष अभ्यास व्हावा यासाठी या अध्यासन केंद्राची भूमिका अधोरेखित होणार आहे. याअनुषंगाने या केंद्राच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम आयोजित केले गेले. अशा पद्धतीच्या कार्यशाळेच्या माध्यमातून वक्तृत्व आणि नेतृत्व गुण विकासाला मोठा हातभार लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्राच्या मार्फत नजीकच्या काळात लीडरशीप डेव्हलपमेंटबाबत काही अभ्यासक्रम सुरु करण्याची विद्यापीठाची योजना असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
Recover your password.
A password will be e-mailed to you.